धाराशिवला पुराचा फटका पण जिल्हाधिकाऱ्याला थिरकण्याचा मोह आवरेना


धाराशिव : मराठवाड्यातील नांदेड, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावं पुराच्या पाण्यात सापडली. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पिकं वाहून गेली. लाखो नागरिक पुरामुळे संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला जाण्याऐवजी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यात मग्न दिसत आहेत.


पुरामुळे २४ सप्टेंबर रोजी अनेकांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली. त्याचवेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमात थिरकत होते. धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पूर आला. संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी आणि नागरिक संकटामध्ये आहेत. बुधवार 24 सप्टेंबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भूम, वाशी आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान भरपाईचा अंदाज घेतला. अजूनही या जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी जिल्हाधिकारी सांस्कृति कार्यक्रमात मग्न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


तुळजापूर येथे देवस्थान समितीने शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सहकुटुंब सहभागी होणार हे आधीच ठरले. धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या पण कार्यक्रमात सहभागी होणार हे ठरले होते. पण पावसाचा तडाखा बसल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंदिर समितीशी बोलून कार्यक्रम टाळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी या दोघांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. जिल्हाधिकारी तर संगीताच्या तालावर थिरकले. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी जिल्हाधिकाऱ्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे.


Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये