धाराशिवला पुराचा फटका पण जिल्हाधिकाऱ्याला थिरकण्याचा मोह आवरेना


धाराशिव : मराठवाड्यातील नांदेड, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावं पुराच्या पाण्यात सापडली. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पिकं वाहून गेली. लाखो नागरिक पुरामुळे संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला जाण्याऐवजी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यात मग्न दिसत आहेत.


पुरामुळे २४ सप्टेंबर रोजी अनेकांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली. त्याचवेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमात थिरकत होते. धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पूर आला. संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी आणि नागरिक संकटामध्ये आहेत. बुधवार 24 सप्टेंबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भूम, वाशी आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान भरपाईचा अंदाज घेतला. अजूनही या जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी जिल्हाधिकारी सांस्कृति कार्यक्रमात मग्न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


तुळजापूर येथे देवस्थान समितीने शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सहकुटुंब सहभागी होणार हे आधीच ठरले. धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या पण कार्यक्रमात सहभागी होणार हे ठरले होते. पण पावसाचा तडाखा बसल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंदिर समितीशी बोलून कार्यक्रम टाळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी या दोघांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. जिल्हाधिकारी तर संगीताच्या तालावर थिरकले. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी जिल्हाधिकाऱ्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे.


Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध