गडचिरोलीतील भामरागडला यंदाच्या वर्षी पाचव्यांदा पुराचा फटका


गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा जबर फटका बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. यावेळी भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद आहे.


पुराचा तडाखा बसलेल्या मराठवाड्याला राज्य शासनाने २२१५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा तडाखा बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प आहे.


पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पाणी चढले. यामुळे, आल्लापल्लीभामरागड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महसूल व पोलीस विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटस लावून बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्या तसेच खासगी वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांची गैरसोय झाली आहे.


Comments
Add Comment

मुंबईत ॲप-आधारित वाहन चालकांवर कारवाई; नियम मोडल्यास थेट दंड आणि एफआयआर!

मुंबई : राज्य शासनाच्या नव्या आदेशांनुसार, ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन न

Sameer Wankhede : समीर वानखेडेचा आर्यन खानवर मानहानीचा आरोप; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात महत्वपूर्ण सुनावणी

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या दिग्दर्शन पदार्पणामुळे चर्चेत असतानाच,

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश मुंबई : देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास

गोरेगावमध्ये होणार म्हाडाची ३८ मजली व्यावसायिक इमारत

राज्य सरकारकडे संबंधित प्रस्ताव सादर मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या

गुंतवणूकदारांनी राज्यातील जहाज बांधणी उद्योगात योगदान द्यावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे आवाहन मुंबई : महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि बंदरे क्षेत्रात

प्रसाद पुरोहित यांना लेफ्टनंटवरून कर्नल पदावर बढती

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. त्यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर