गडचिरोलीतील भामरागडला यंदाच्या वर्षी पाचव्यांदा पुराचा फटका


गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा जबर फटका बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. यावेळी भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद आहे.


पुराचा तडाखा बसलेल्या मराठवाड्याला राज्य शासनाने २२१५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा तडाखा बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प आहे.


पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पाणी चढले. यामुळे, आल्लापल्लीभामरागड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महसूल व पोलीस विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटस लावून बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्या तसेच खासगी वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांची गैरसोय झाली आहे.


Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील