Devendra Fadanvis : अतिवृष्टीने माढ्यात शेतीचं मोठं नुकसान, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट पाहणी, मदतीचे आश्वासन

सोलापूर : महाराष्ट्रात पावसाचा तुफान थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, सोलापूर, लातूरसह इतर भागांमध्ये गावं, घरं आणि शेती पाण्याखाली बुडाली आहेत. या अतिवृष्टीमुळे नागरिकांना राहणीमानात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे; काहींना राहण्यासाठी जागा नाही, घालण्यासाठी कोरडे कपडे नाहीत, तर अन्नाचा अभावही जाणवतो आहे. पूरग्रस्त परिस्थिती पाहता राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले असून, तातडीने नागरिकांना आधार देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांच्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. या दौऱ्यात नुकसानग्रस्तांच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजनांची रूपरेषा ठरवली जाणार आहे.



मुख्यमंत्री फडणवीस माढ्यातील निमगाव दौऱ्यावर


माढ्यातील निमगाव आणि आसपासच्या गावांमध्ये मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून, शेती पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज थेट निमगावात भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दौऱ्यात आमदार अभिजीत पाटील आणि जयकुमार गोरे देखील उपस्थित होते.



मुख्यमंत्र्यांकडून माढ्यात पूरग्रस्त भागाची सविस्तर पाहणी


माढ्यातील निमगाव, उंदरगाव, वाकाव, दारफळसह सीना नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागाला भेट देऊन तिथील अधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना संपूर्ण परिस्थिती तपशीलवार सांगितली, ज्यामुळे हाहाकाराची खरी स्थिती समजून आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ड्रोनद्वारे परिसराचे दृश्य पाहिले, नुकसानाचा सविस्तर आढावा घेतला आणि पुरामुळे शेती व जमीन कितपत प्रभावित झाली आहे याची आकडेवारीही तपासली. काही ठिकाणी माती वाहून गेल्यामुळे हजारो एकर शेतीपिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी हतबल दिसले. राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळेल अशी खात्री त्यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीचे प्रयत्न सुरु आहेत, जेणेकरून परिस्थिती सुधारता येईल.



महिलांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा


निमगाव दौऱ्यादरम्यान स्थानिक महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गावातील पूरस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी तिथल्या पावसाची मात्रा, पाणी साचल्याचे भाग, नुकसान झालेली शेती व पिकांचे वाय, तसेच इतर अडचणींचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. महिलांनी शांत आणि संयमित पद्धतीने आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या. त्यांची व्यथा ऐकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने योग्य मदत करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीच्या पाहणीनंतर पुढील टप्प्यात मुख्यमंत्री दारफळ गावात जाऊन तिथील नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी करतील, असे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत