मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवास अधिक स्वस्त आणि सुलभ होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.



इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीचे भाडेदर :


प्रारंभिक १.५ किलोमीटरसाठी ₹१५ , त्यानंतर प्रत्येक किमीला ₹१०.२७ आकारले जाणार आहे . हे दर ई-बाईकसाठीच लागू होतील.


ही सेवा ओला, उबर आणि रॅपिडो या मोठ्या मोबिलिटी कंपन्यांना तात्पुरत्या परवान्यांद्वारे मंजूर करण्यात आली आहे. स्मार्ट-राईड या चौथ्या कंपनीला अटी पूर्ण न केल्यामुळे मंजुरी नाकारण्यात आली आहे.



नियमावली व परवाने


महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ नुसार कंपन्यांना पुढील महिन्यात कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.


हा निर्णय १८ ऑगस्ट रोजी राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.


सेवा सुरू ठेवण्यासाठी सर्व नियम आणि अटींचे पालन आवश्यक आहे.


मुंबईत सध्या काळी-पिवळी टॅक्सीची सुरुवातीची भाडेवाढ ₹३१, तर ऑटो रिक्षासाठी ₹२६ आहे. त्यामानाने बाईक टॅक्सीची सेवा कमी दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे .



कोणत्या शहरांमध्ये मिळणार ई-बाईक टॅक्सी सेवा ?


राज्य सरकारने ठराव जाहीर करून जिथे लोकसंख्या १ लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ही सुविधा फक्त मुंबईपुरती मर्यादित न राहता, इतर मोठ्या शहरांमध्येही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०