सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते.


डोंबिवली: भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी हा विजय पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला असला तरी, या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी टीम इंडियाने हा सामना खेळायलाच नको होता अशी ठाम प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीचे संतोष जगदाळे, यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये काल खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  त्यांनी म्हंटले, "भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकोच होते."

काय म्हणाल्या प्रगती जगदाळे?


प्रगती जगदाळे पुढे म्हणाल्या की, मी सूर्यकुमार यादवला सांगू इच्छिते की, पहलगाम हल्ल्यातील बळींना हा विजय समर्पित करण्याऐवजी, टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको होते. जर भारताने हा सामना खेळला नसता तर आम्हाला अधिक अभिमान वाटला असता, परंतु टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला, ज्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ जणांचा बळी घेतला आहे. याआधी झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे दहशतवादी होते. आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान आपला शत्रू आहे. आपण त्यांच्यासोबत खेळायला नकोच. टीम इंडियाने विजयासह हा सामना पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला आहे, परंतु जर ते जिंकले नसते तर आमच्या खेळाडूंना पश्चात्ताप झाला असता. भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे"

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाला भारताने १२७/९ च्या धावसंख्येवर रोखले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर शाहीन आफ्रिदीने संघाच्या खात्यात ३३ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १५.५ षटकांत विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ४७ धावा काढत नाबाद राहिला, तर तिलक वर्माने संघाच्या खात्यात ३१ धावांचे योगदान दिले.  या विजयासह 'सुपर फोर'मध्ये भारताचा प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे.
Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे