सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर


सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी एक असलेल्या पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता वाघांची डरकाळी घुमणार आहे. वाघांच्या स्थलांतर प्रस्तावात तीन वेळा निघालेल्या त्रुटी दूर करून चांगल्या श्रेणीमध्ये स्थान मिळवल्यानंतर ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी, अशा आठ वाघांना जेरबंद करून सह्याद्रीमध्ये सोडण्यास केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.


सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. २०१८ च्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ३७ व्या क्रमांकावर होता. मात्र, मागील तीन वर्षांत क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने चांगल्या श्रेणीमध्ये स्थान मिळवत ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३७ व्या स्थानावरून २७ व्या स्थानावर झेप घेतली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना २०१० मध्ये झाल्यापासून २०१०, २०१४, २०१८मध्ये झालेल्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने “फेअर आणि गुड” अशा श्रेण्या मिळवल्या होत्या.


व्याघ्रगणनेच्या २०२२ च्या अहवालात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या एकही वाघ नाही, असे नमूद होते. त्यामुळे राज्याच्या वन खात्याने पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची योजना आखली. हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेला आणि दीड वर्षांपूर्वी परवानगी मिळाली. मात्र, प्रस्तावात तीनवेळा त्रुटी निघाल्या. त्या दूर करून पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला.



...तर परवानगी रद्द होणार 


वाघांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी किंवा धोक्यात आणणारी कोणतीही चूक घडल्यास केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दिलेल्या परवानगीचा आढावा घेण्यात येईल किंवा ती रद्द करण्यात येईल, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन वाघांचा अधिवास आहे. ही संख्या वाढण्यासाठी ताडोबा आणि पेंच प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यास परवानगी मिळाली आहे; परंतु आम्ही आधी दोन मादी वाघांना सह्याद्रीमध्ये आणणार आहोत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य वाघांना आणले जाणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८