Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम


मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावर आता सरकारने कडक पावले उचलली आहेत. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत घोषणा केली की, मुंबईसह संपूर्ण राज्यात संशयास्पद बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी विशेष 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले जाईल. झोपडपट्ट्या, संवेदनशील भाग आणि मोठ्या गृहप्रकल्पांच्या ठिकाणी ही मोहीम राबवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष 'टास्कफोर्स' तैनात करण्यात येणार आहे. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिली.



बोगस कागदपत्रांच्या जोरावर घुसखोरी; दरेकरांनी वेधले लक्ष


या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी अत्यंत गंभीर मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईतील अनेक भागांत सुमारे ३,०१४ संशयित घुसखोर आढळले असून, एजंटांच्या माध्यमातून त्यांना आधार कार्ड आणि इतर अधिकृत दस्तऐवज मिळवून दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "या घुसखोरांमुळे स्थानिक मराठी माणूस आणि हिंदू समाज स्वतःच्या हक्काच्या व्यवसायांपासून बाजूला फेकला जात आहे," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावर बोलताना मंत्री कदम यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार आता पुरावे मिळाल्यास गुन्ह्याची वाट न पाहता घुसखोरांना थेट हद्दपार (Deport) करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामुळे कारवाईचा वेग वाढला आहे.



बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांवर पोलिसांची नजर


मुंबईत सुरू असलेल्या मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांवर बांगलादेशी मजूर काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने आता कडक एसओपी (SOP) लागू केली आहे. सर्व सरकारी आणि खासगी कंत्राटदारांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती न दिल्यास थेट कंत्राटदारांवरच गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सरकारने दिला आहे. या कारवाईमुळे अवैध मजुरांच्या प्रमाणात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाल्याचा दावाही गृह राज्यमंत्र्यांनी केला.



राज्यात पहिले 'डिटेन्शन सेंटर' सज्ज; २० कोटींचा निधी मंजूर


पकडलेल्या घुसखोरांना ठेवण्यासाठी राज्यात कायमस्वरूपी जागा नसल्यामुळे होणारी अडचण आता दूर होणार आहे. राज्याचे पहिले 'डिटेन्शन सेंटर' उभारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच, मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात पाच जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून, एटीएस (ATS) आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत २,३७६ हून अधिक घुसखोरांना हद्दपार करण्यात आले असून, महाराष्ट्र या कारवाईत देशात अग्रस्थानी असल्याचे कदम यांनी अभिमानाने नमूद केले.



बांग्लादेशी घुसखोरांची हद्दपारीची आकडेवारी


२०२१ – १०९ जणांना हद्दपार
२०२२ – ७७ जणांना हद्दपार
२०२३ – १२७ जणांना हद्दपार
२०२४ – २०२ जणांना हद्दपार
२०२५ – २,३७६ पेक्षा अधिक जणांना हद्दपार

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी