आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...


नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या घटनेने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. ही घटना एका कंपनीचे मालक केव्ही अय्यर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केली आहे.


त्यांचे ४० वर्षीय कर्मचारी शंकर यांनी सकाळी ८:३७ वाजता त्यांना मेसेज करून "माझ्या पाठीत खूप दुखत आहे, त्यामुळे मी आज येऊ शकत नाही, कृपया मला रजा द्या" असे सांगितले. अय्यर यांनी लगेच "ठीक आहे, आराम करा" असे उत्तर दिले. परंतु, ८:४७ वाजता त्यांना शंकर यांच्या मृत्यूची बातमी मिळाली.


के. व्ही. अय्यर यांनी सांगितले की, शंकर हा गेल्या ६ वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होता. तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता. तो दारू किंवा सिगारेटला स्पर्श करत नव्हता.


 


शंकर विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. शंकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) झाल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "माझा सहकारी, जो १० मिनिटांपूर्वी माझ्याशी बोलत होता, तो आता या जगात नाही. एका व्यक्तीने, शुद्धीवर असताना, त्याच्या शेवटच्या श्वासाच्या १० मिनिटांपूर्वी मला मेसेज केला. मी पूर्णपणे हादरून गेलो आहे.


Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर