आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...


नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या घटनेने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. ही घटना एका कंपनीचे मालक केव्ही अय्यर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केली आहे.


त्यांचे ४० वर्षीय कर्मचारी शंकर यांनी सकाळी ८:३७ वाजता त्यांना मेसेज करून "माझ्या पाठीत खूप दुखत आहे, त्यामुळे मी आज येऊ शकत नाही, कृपया मला रजा द्या" असे सांगितले. अय्यर यांनी लगेच "ठीक आहे, आराम करा" असे उत्तर दिले. परंतु, ८:४७ वाजता त्यांना शंकर यांच्या मृत्यूची बातमी मिळाली.


के. व्ही. अय्यर यांनी सांगितले की, शंकर हा गेल्या ६ वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होता. तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता. तो दारू किंवा सिगारेटला स्पर्श करत नव्हता.


 


शंकर विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. शंकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) झाल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "माझा सहकारी, जो १० मिनिटांपूर्वी माझ्याशी बोलत होता, तो आता या जगात नाही. एका व्यक्तीने, शुद्धीवर असताना, त्याच्या शेवटच्या श्वासाच्या १० मिनिटांपूर्वी मला मेसेज केला. मी पूर्णपणे हादरून गेलो आहे.


Comments
Add Comment

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे