आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...


नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या घटनेने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. ही घटना एका कंपनीचे मालक केव्ही अय्यर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केली आहे.


त्यांचे ४० वर्षीय कर्मचारी शंकर यांनी सकाळी ८:३७ वाजता त्यांना मेसेज करून "माझ्या पाठीत खूप दुखत आहे, त्यामुळे मी आज येऊ शकत नाही, कृपया मला रजा द्या" असे सांगितले. अय्यर यांनी लगेच "ठीक आहे, आराम करा" असे उत्तर दिले. परंतु, ८:४७ वाजता त्यांना शंकर यांच्या मृत्यूची बातमी मिळाली.


के. व्ही. अय्यर यांनी सांगितले की, शंकर हा गेल्या ६ वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होता. तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता. तो दारू किंवा सिगारेटला स्पर्श करत नव्हता.


 


शंकर विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. शंकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) झाल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "माझा सहकारी, जो १० मिनिटांपूर्वी माझ्याशी बोलत होता, तो आता या जगात नाही. एका व्यक्तीने, शुद्धीवर असताना, त्याच्या शेवटच्या श्वासाच्या १० मिनिटांपूर्वी मला मेसेज केला. मी पूर्णपणे हादरून गेलो आहे.


Comments
Add Comment

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच