कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड केला आहे. या कॉल सेंटरमधून  परदेशी नागरिकांची लाखों रुपयांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे कॉल सेंटर प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडामधील परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. ते स्वतः अ‍ॅमेझॉन सपोर्ट स्टाफ असल्याचे भासवून आणि गिफ्ट कार्ड तसेच  क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे मिळवण्यासाठी फिशिंग कॉल आणि फसव्या पद्धतींचा वापर करत होते.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर विमा एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांशी संपर्क साधत होते, आणि त्यांचकडून लाखो रुपयांची लूट केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे गैरकृत्यासाठी तब्बल ६० जणांना कामावर ठेवण्यात आले होते.

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ठाणे सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात आणखी काही लोकांचादेखील सहभाग आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईत सीबीआयला परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक पुरावे मोठ्या प्रमाणावर हाती लागले आहेत. याबरोबरच, सदर ठिकाणी तब्बल ५ लाख रुपये रोख, मोबाईल हँडसेट्स, संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत.

 
Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह