कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड केला आहे. या कॉल सेंटरमधून  परदेशी नागरिकांची लाखों रुपयांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे कॉल सेंटर प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडामधील परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. ते स्वतः अ‍ॅमेझॉन सपोर्ट स्टाफ असल्याचे भासवून आणि गिफ्ट कार्ड तसेच  क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे मिळवण्यासाठी फिशिंग कॉल आणि फसव्या पद्धतींचा वापर करत होते.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर विमा एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांशी संपर्क साधत होते, आणि त्यांचकडून लाखो रुपयांची लूट केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे गैरकृत्यासाठी तब्बल ६० जणांना कामावर ठेवण्यात आले होते.

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ठाणे सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात आणखी काही लोकांचादेखील सहभाग आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईत सीबीआयला परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक पुरावे मोठ्या प्रमाणावर हाती लागले आहेत. याबरोबरच, सदर ठिकाणी तब्बल ५ लाख रुपये रोख, मोबाईल हँडसेट्स, संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत.

 
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये