कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड केला आहे. या कॉल सेंटरमधून  परदेशी नागरिकांची लाखों रुपयांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे कॉल सेंटर प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडामधील परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. ते स्वतः अ‍ॅमेझॉन सपोर्ट स्टाफ असल्याचे भासवून आणि गिफ्ट कार्ड तसेच  क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे मिळवण्यासाठी फिशिंग कॉल आणि फसव्या पद्धतींचा वापर करत होते.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर विमा एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांशी संपर्क साधत होते, आणि त्यांचकडून लाखो रुपयांची लूट केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे गैरकृत्यासाठी तब्बल ६० जणांना कामावर ठेवण्यात आले होते.

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ठाणे सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात आणखी काही लोकांचादेखील सहभाग आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईत सीबीआयला परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक पुरावे मोठ्या प्रमाणावर हाती लागले आहेत. याबरोबरच, सदर ठिकाणी तब्बल ५ लाख रुपये रोख, मोबाईल हँडसेट्स, संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत.

 
Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली