Chitra Wagh : शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना रडत रौत अजून गप्प कसे?

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल


मुंबई : कर्नाटक राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरमधील ‘शिवाजीनगर मेट्रो स्टेशन’चे नाव बदलून ‘सेंट मेरी’ करण्याची मागणी काँग्रेस आमदार रिझवान यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या मागणीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाठिंबा देत, नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.


?si=N6vEzRI2BdWPQue0

चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर थेट हल्ला


भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "पुन्हा एकदा काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष उफाळून आला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कर्नाटक काँग्रेसने केलेल्या या कृतीवर महाराष्ट्र काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.


"महाराष्ट्रातील काँग्रेस आता तरी आपली भूमिका स्पष्ट करणार की गप्प बसणार?" असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असलेले त्यांचे मित्रपक्ष, विशेषतः त्यांच्यावर टीका करणारे, आता या अपमानावर गप्प का आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. "उबाठा गटाला डिवचत त्यांनी म्हटले की, इथले त्यांचे मित्रपक्ष आहेत... त्यांचा स्वयंघोषित विश्वगुरू रडत रौत अजून गप्प कसे?" असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.



राजकीय वादळ आणि महाराष्ट्रातील शांतता


कर्नाटक सरकारमधील या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षांनी या अपमानावर गप्प राहणे, ही गंभीर बाब आहे. भाजपचा आरोप आहे की, कर्नाटक काँग्रेसने केलेला हा अपमान महाराष्ट्रातील काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मान्य आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं.


सध्या तरी, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हा मुद्दा आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा रंगतदार संघर्ष निर्माण करणार, यात शंका नाही.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत