सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी


सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत आहे. सोलापूर जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये गटाराचे पाणी घुसले आहे. रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात वाताहात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.


हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला होता. जिल्ह्यात २४ तासांत ११८.३ मिमी पावसाची नोंद झाली. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून चार हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. बोरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. नदी किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतूक पुरती मंदावली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नगरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. नागरिकांची तारांबळ उडाली.


Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात