सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी


सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत आहे. सोलापूर जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये गटाराचे पाणी घुसले आहे. रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात वाताहात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.


हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला होता. जिल्ह्यात २४ तासांत ११८.३ मिमी पावसाची नोंद झाली. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून चार हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. बोरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. नदी किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतूक पुरती मंदावली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नगरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. नागरिकांची तारांबळ उडाली.


Comments
Add Comment

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी

caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड: