सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी


सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत आहे. सोलापूर जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये गटाराचे पाणी घुसले आहे. रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात वाताहात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.


हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला होता. जिल्ह्यात २४ तासांत ११८.३ मिमी पावसाची नोंद झाली. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून चार हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. बोरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. नदी किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतूक पुरती मंदावली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नगरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. नागरिकांची तारांबळ उडाली.


Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक