उकळत्या पाण्याने केला घात, PSI परीक्षेत राज्यातील मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून २०२३ मध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा अकस्मात मृत्यू झाला. बाथरुममध्ये हिटरचा धक्का बसून उकळतं पाणी अंगावर पडल्यामुळे अश्विनी केदारी ८० टक्के भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पण २८ ऑगस्ट पासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर दहा दिवसांनी संपली. अश्विनी केदारी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या.


पिंपरी चिंचवडच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात अश्विनी केदारी यांच्यावर उपचार सुरू होते. पण गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांच्याकडून उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अश्विनी केदारी यांची दहा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.


पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी भविष्यात जिल्हाधिकारी होता यावे म्हणून प्रशासकीय परीक्षेची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. पण भलतच घडलं. पहाटे अभ्यासासाठी उठलेल्या अश्विनी केदारी यांनी घोळीला गरम पाणी करण्यासाठी बालदीमध्ये हिटर लावला होता. अचानक त्यांचा डोळा लागला आणि थोडा वेळाने त्यांना जाग आली. त्यावेळी पाणी जास्त गरम झालं होतं. हिटर बंद करुन बालदी उचलत असताना त्यातील उकळतं पाणी सांडलं आणि अश्विनी केदारी पाय घसरुन पडल्या. या अपघातात त्यांचं शरीर ८० टक्के भाजले होते. गंभीररित्या भाजल्यामुळे वाचणे कठीण असल्याची जाणीव आधीच झाली होती पण डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. हे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.


Comments
Add Comment

ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास नोकरी जाणार!

पीएमपीएमएल चालकांसाठी  महत्त्वाची बातमी पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) अलीकडेच झालेल्या

Pune News : धक्कादायक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा छळ, ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात तब्बल ३३ तास अखंड सुरू राहिलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून

नियमित रेशन न घेणारे ठरणार अपात्र

३४ हजार ७१४ लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद अलिबाग (प्रतिनिधी) : रेशनवरील धान्याची उचल वेळोवेळी न करणाऱ्यांचा

नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क