Pankaja Munde on Maratha reservation :  “ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची ठाम भूमिका”

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता यश मिळालं आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आलं असून, मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य केल्याचं जाहीर केलं आहे. या निर्णयानुसार, गावातील लोक, नात्यातील लोक आणि कुळातील लोक यांची चौकशी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.


या घडामोडींवर राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. मला हे आधीपासूनच असं वाटत आलं आहे आणि पुढेही असंच वाटत राहील, यात कोणताही बदल होणार नाही.


ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती स्थापन


मराठा समाजासाठी शासनाने जीआर (Government Resolution) काढला असला तरी त्याचा परिणाम ओबीसी समाजावर होऊ नये, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याचे पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, असा सुवर्णमध्य राज्य सरकार काढेल अशी प्रार्थना आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


मुंडे म्हणाल्या की, सर्व समाज सुखाने आणि शांततेने नांदावा हीच आपली खरी इच्छा आहे. सामाजिक मागासलेपणाचा प्रश्न ओबीसी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि सरकार या समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका निश्चितच घेईल, असा मला विश्वास आहे. जर नव्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो असे वाटत असेल, तर त्याची तपासणी करण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे. त्या काळात सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जाईल. “ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा ठाम शब्द आहे,” असे आश्वासन देतानाच, मुंडे यांनी सांगितले की सरकारकडून अन्याय टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं आधीच उचलली जात आहेत.


हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण, आतापर्यंत जवळपास ५८ लाख ऐतिहासिक नोंदी शोधून काढण्यात आल्या आहेत. या नोंदींच्या आधारे अनेक मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील लाखो मराठा कुटुंबांना आरक्षणाचा मार्ग अधिक सुकर होणार असून, समाजात समाधान आणि दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात

Comments
Add Comment

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती

मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा