Pankaja Munde on Maratha reservation :  “ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची ठाम भूमिका”

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता यश मिळालं आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आलं असून, मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य केल्याचं जाहीर केलं आहे. या निर्णयानुसार, गावातील लोक, नात्यातील लोक आणि कुळातील लोक यांची चौकशी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.


या घडामोडींवर राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. मला हे आधीपासूनच असं वाटत आलं आहे आणि पुढेही असंच वाटत राहील, यात कोणताही बदल होणार नाही.


ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती स्थापन


मराठा समाजासाठी शासनाने जीआर (Government Resolution) काढला असला तरी त्याचा परिणाम ओबीसी समाजावर होऊ नये, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याचे पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, असा सुवर्णमध्य राज्य सरकार काढेल अशी प्रार्थना आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


मुंडे म्हणाल्या की, सर्व समाज सुखाने आणि शांततेने नांदावा हीच आपली खरी इच्छा आहे. सामाजिक मागासलेपणाचा प्रश्न ओबीसी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि सरकार या समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका निश्चितच घेईल, असा मला विश्वास आहे. जर नव्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो असे वाटत असेल, तर त्याची तपासणी करण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे. त्या काळात सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जाईल. “ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा ठाम शब्द आहे,” असे आश्वासन देतानाच, मुंडे यांनी सांगितले की सरकारकडून अन्याय टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं आधीच उचलली जात आहेत.


हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण, आतापर्यंत जवळपास ५८ लाख ऐतिहासिक नोंदी शोधून काढण्यात आल्या आहेत. या नोंदींच्या आधारे अनेक मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील लाखो मराठा कुटुंबांना आरक्षणाचा मार्ग अधिक सुकर होणार असून, समाजात समाधान आणि दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि