Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते, ज्यात त्यांनी यश मिळवले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही त्यांची मुख्य मागणी होती. सरकारने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांच्यावर मोठी टीका केली होती. ज्यात त्यांनी नितेश राणे यांना चिचुंद्री म्हणून उल्लेख करत राजकीय वातावरण तापवले होते. ज्यावर नितेश राणे काय प्रत्युत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आंदोलनाच्या दरम्यान जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती, त्यादरम्यान त्यांनी फडणविसांच्या आई बहिणीवरून अपशब्द काढले होते. ज्यावर मंत्री नितेश राणे यांनी जरांगेवर टीका केली होती. त्यानंतरही नितेश राणे यांनी मराठा आंदोलनाविरुद्ध जरांगेंचा समाचार घेतला होता. ज्याच्या प्रत्युत्तरादाखल जरांगेंची नितेश राणेवर टीका करताना जीभ घसरली. जरांगे यांनी थेट नितेश राणे यांना चिंचुद्री असे म्हणत, "फक्त एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच अशी धमकी देखील दिली होतिउ.  यानंतर राणे नेमके काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आता नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?


मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना दिसले. नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन संपल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आतापर्यंत जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्येच! आता मराठा समाजाने याची दखल घेतली पाहिजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत, असे नितेश राणेंनी म्हटले.
Comments
Add Comment

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू?

राज्य निवडणूक आयोगाची आज आयुक्तांसोबत बैठक २७ महानगरांचे सोपे गणित, ५०% आरक्षणात जिल्हा परिषदा