पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात होईल. पुणे शहरात विशेषतः मानाच्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुका ठरलेल्या वेळेनुसार पार पडणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भक्तगण या मिरवणुकांसाठी रस्त्यावर गर्दी करणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


मिरवणुका वेळेत पार पडाव्यात यासाठी संबंधित मंडळांनी वेळापत्रक निश्चित केले असून खाली त्याचा तपशील दिला आहे:


मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती : या गणपतीची मिरवणूक सकाळी ८ वाजता निघेल . प्रभात बँड आणि ढोलताशा पथकासह मिरवणूक निघेल. प्रतिष्ठापना आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होईल.


मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी मंडळ : सकाळी १० वाजता केळकर रस्त्यावरून मिरवणूक निघेल . या गणपतीचे यंदाचे १३३ वे वर्ष आहे . प्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरच्या
महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती मंडळाने उभारली आहे.


मानाचा तिसरा गणपती – गुरुजी तालीम मंडळ : सकाळी ११ वाजता या गणपतीची मिरवणूक निघेल . दुपारी २. ३४ वाजता प्राणप्रतिष्ठा होईल . हे मंडळ यंदा १३९ व्या वर्षात पदार्पण करत असून, आकर्षक फुलांच्या रथातून गणेश मूर्ती आणली जाईल.


मानाचा चौथा गणपती – तुळशीबाग गणपती मंडळ : दुपारी १२. १५ वाजता या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल . यंदा मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे. प्रतिष्ठापना निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते होईल. यंदा वृंदावनाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.


मानाचा पाचवा गणपती – केसरीवाडा गणपती मंडळ : सकाळी ९ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात होईल. सकाळी १० ते ११ यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी ११ वाजता बाप्पाच्या महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे .


सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल पुणे प्रशासनाकडून उचलण्यात आले आहे . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणूक मार्गांवरील सर्व दारू विक्री केंद्रांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणेकरांनी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे