पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात होईल. पुणे शहरात विशेषतः मानाच्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुका ठरलेल्या वेळेनुसार पार पडणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भक्तगण या मिरवणुकांसाठी रस्त्यावर गर्दी करणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


मिरवणुका वेळेत पार पडाव्यात यासाठी संबंधित मंडळांनी वेळापत्रक निश्चित केले असून खाली त्याचा तपशील दिला आहे:


मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती : या गणपतीची मिरवणूक सकाळी ८ वाजता निघेल . प्रभात बँड आणि ढोलताशा पथकासह मिरवणूक निघेल. प्रतिष्ठापना आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होईल.


मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी मंडळ : सकाळी १० वाजता केळकर रस्त्यावरून मिरवणूक निघेल . या गणपतीचे यंदाचे १३३ वे वर्ष आहे . प्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरच्या
महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती मंडळाने उभारली आहे.


मानाचा तिसरा गणपती – गुरुजी तालीम मंडळ : सकाळी ११ वाजता या गणपतीची मिरवणूक निघेल . दुपारी २. ३४ वाजता प्राणप्रतिष्ठा होईल . हे मंडळ यंदा १३९ व्या वर्षात पदार्पण करत असून, आकर्षक फुलांच्या रथातून गणेश मूर्ती आणली जाईल.


मानाचा चौथा गणपती – तुळशीबाग गणपती मंडळ : दुपारी १२. १५ वाजता या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल . यंदा मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे. प्रतिष्ठापना निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते होईल. यंदा वृंदावनाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.


मानाचा पाचवा गणपती – केसरीवाडा गणपती मंडळ : सकाळी ९ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात होईल. सकाळी १० ते ११ यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी ११ वाजता बाप्पाच्या महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे .


सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल पुणे प्रशासनाकडून उचलण्यात आले आहे . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणूक मार्गांवरील सर्व दारू विक्री केंद्रांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणेकरांनी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या