पोलीस भरतीचा जीआर आला; महाराष्ट्रात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती!

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांच्या मेगाभरतीसाठी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरतीला मान्यता देण्यात आली होती आणि आता त्याचा अधिकृत जीआर प्रसिद्ध झाला आहे.




  • पोलीस शिपाई पदासाठी १२,३९९ जागा

  • पोलीस शिपाई चालक पदासाठी २३४ जागा

  • बॅंड्समनसाठी २५ जागा

  • सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी २,३९३ जागा

  • कारागृह शिपाईसाठी ५८० जागा 


या भरती प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत.



वयोमर्यादेत सूट: सन २०२२ आणि २०२३ मध्ये ज्या उमेदवारांनी संबंधित पदांची कमाल वयोमर्यादा ओलांडली होती, त्यांना एक विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.


परीक्षा पद्धत: ही भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवली जाईल आणि लेखी परीक्षा OMR आधारित पद्धतीने घेतली जाईल.


परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाईल.


पारदर्शकता: या भरती प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी आणि नियंत्रण पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे असेल, जेणेकरून भरती पारदर्शक आणि सुरळीत पार पडेल.


ही भरती प्रक्रिया १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त झालेली आणि रिक्त होणारी पदे भरण्यासाठी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत येण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी