पोलीस भरतीचा जीआर आला; महाराष्ट्रात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती!

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांच्या मेगाभरतीसाठी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरतीला मान्यता देण्यात आली होती आणि आता त्याचा अधिकृत जीआर प्रसिद्ध झाला आहे.




  • पोलीस शिपाई पदासाठी १२,३९९ जागा

  • पोलीस शिपाई चालक पदासाठी २३४ जागा

  • बॅंड्समनसाठी २५ जागा

  • सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी २,३९३ जागा

  • कारागृह शिपाईसाठी ५८० जागा 


या भरती प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत.



वयोमर्यादेत सूट: सन २०२२ आणि २०२३ मध्ये ज्या उमेदवारांनी संबंधित पदांची कमाल वयोमर्यादा ओलांडली होती, त्यांना एक विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.


परीक्षा पद्धत: ही भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवली जाईल आणि लेखी परीक्षा OMR आधारित पद्धतीने घेतली जाईल.


परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाईल.


पारदर्शकता: या भरती प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी आणि नियंत्रण पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे असेल, जेणेकरून भरती पारदर्शक आणि सुरळीत पार पडेल.


ही भरती प्रक्रिया १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त झालेली आणि रिक्त होणारी पदे भरण्यासाठी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत येण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार