पोलीस भरतीचा जीआर आला; महाराष्ट्रात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती!

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांच्या मेगाभरतीसाठी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरतीला मान्यता देण्यात आली होती आणि आता त्याचा अधिकृत जीआर प्रसिद्ध झाला आहे.




  • पोलीस शिपाई पदासाठी १२,३९९ जागा

  • पोलीस शिपाई चालक पदासाठी २३४ जागा

  • बॅंड्समनसाठी २५ जागा

  • सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी २,३९३ जागा

  • कारागृह शिपाईसाठी ५८० जागा 


या भरती प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत.



वयोमर्यादेत सूट: सन २०२२ आणि २०२३ मध्ये ज्या उमेदवारांनी संबंधित पदांची कमाल वयोमर्यादा ओलांडली होती, त्यांना एक विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.


परीक्षा पद्धत: ही भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवली जाईल आणि लेखी परीक्षा OMR आधारित पद्धतीने घेतली जाईल.


परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाईल.


पारदर्शकता: या भरती प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी आणि नियंत्रण पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे असेल, जेणेकरून भरती पारदर्शक आणि सुरळीत पार पडेल.


ही भरती प्रक्रिया १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त झालेली आणि रिक्त होणारी पदे भरण्यासाठी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत येण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा