सकाळच्या सत्रात तोटा होऊन देखील वोडाफोन आयडिया शेअर्समध्ये जबरदस्त ८% वाढ ! 'या' कारणाने!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आज वोडाफोन आयडिया (VI) कंपनीच्या शेअर्समध्ये ८% पेक्षा अधिक तेजी आली आहे. सकाळी सुरुवातीलाच शेअर ८% पेक्षा अधिक पातळीने उसळला हो ता. सकाळी १०.४९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ७.६४% उसळी आल्याने शेअरची किंमत ६.६२ रूपयांवर पोहोचली आहे. विशेषतः कंपनीच्या तिमाही निकालानंतरही ही घसरण झाली. पर वा कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर पहिल्या तिमाहीत ६६०८ कोटींचे नुकसान झाले आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ६४३२ कोटींचे नुकसान झाले होते.मुख्यतः आज शेअरमध्ये झालेली वाढ ही कंपनीच्या निकालानुसार एआरपीयु (Average Revenue per User ARPU) मुळे झालेली आहे.

कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील १०५०८ कोटींच्या तुलनेत वाढ होत यातिमाहीत ११०२३ कोटींचा महसूल मिळा ला आहे. ही वाढ ५% होती. म्हणजेच प्रत्येक ग्राहकांकडून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १५% वाढ झाली आहे. मागील तिमाहीत हा महसूल १५४ कोटी होता तो वाढत या तिमा हीत १७७ कोटी रुपये झाला आहे.

माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ झाली होती. मागील वर्षाच्या तिमाहीतील ४२०५ कोटींच्या तुलनेत यावर्षी तिमाहीत ४६१२ कोटींवर कमाई वर गेली आहे. विशेषतः ईबीटा मार्जिनमध्ये १८० (बीपीएस) बेसिस पूर्णांकाने वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत हे मार्जिन ४०% होते ते वाढत यावेळी ४१.०८ % वर पोहोचले परिणामी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये सु़धारणा झाल्याने शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मागील चौथ्या तिमाहीत तोटा ७१६६ कोटी रुपयांवरून क्रमिक आधारावर कमी झाला तर टॉपलाइन कामगिरी तिमाही आधारावर स्थिर झाली होती. व्होडाफोनने १३ मंडळांमधील २२ शहरांमध्ये 5G सेवा सुरू केल्या आहेत तर त्यांचा 4G विस्तार सुरू आहे. ग्राहकांच्या तोट्यात ९०% घट झाल्यामुळे त्यांच्या धोरणात्मक गुंतवणुकीचा फायदा झाला आहे असे कंपनीने तिमाही निकाल जाहीर करताना म्हटले आहे.

कंपनीची एकूण ग्राहकसंख्या (Subscriber) १९७.७ दशलक्ष होती. तिमाहीतील आकडेवारी कंपनीने १२७.४ दशलक्ष ४G/५G ग्राहक होती. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १२६.७ दशलक्ष होती. कंपनीने म्हटले आहे की गेल्या तीन तिमाहीत 4G कव्हरेज वाढवण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम दिसू लागले आहेत, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीच्या तु लनेत ९०% कमी ग्राहक तोटा दर्शविते, विलीनीकरणानंतरची ही सर्वात कमी घट आहे.

याशिवाय एकूणच संपूर्ण निकालावर भाष्य करताना कंपनीच्या कमाईवर भाष्य करताना मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षया मुंद्रा यांनी पहिल्या तिमाहीला 'निर्णायक टर्नअराउंड' तिमाही म्हटले आ हे.'गेल्या तीन तिमाहीत आमच्या 4G कव्हरेजचा विस्तार करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम दिसू लागले आहेत, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमा ही च्या तुलनेत ९० % कमी ग्राहक तोटा यातून दिसून येते, जो विलीनीकरणानंतरचा सर्वात कमी ग्राहक घट आहे.आमच्या 5G सेवा आता १३ मंडळांमधील २२ शहरांमध्ये कार्यरत आहेत आणि वाढत्या अनुषंगाने आ म्ही आमच्या 5G फूटप्रिंटचा पद्धतशीरपणे विस्तार करण्यास वचनबद्ध आहोत.' असे म्हटले.
Comments
Add Comment

पुराचा फटका बसलेल्यांना दिलासा मिळणार, केंद्राकडून आली मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. हे बाळ सध्या कूपर रुग्णालयात उपचार

नाशिकमध्ये कर्मभूमी एक्स्प्रेसमधून तिघे खाली पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नाशिक : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेल्या आणि बिहारच्या रकसोलकडे जात असलेल्या कर्मभूमी

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात