गुहागर : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचं बुकिंग

गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी 150 गाड्यांचे बुकिंग झाले आहे. तर येणाऱ्या फेऱ्या धरून यावर्षी 500 गाड्यांचे उद्दिष्ट गाठणार असल्याची माहिती गुहागर आगारप्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली.गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळाचे गुहागर आगार सज्ज राहिले आहे. मुंबई व पुणे या भागातून तब्बल अडीचशे ते पावणेतीनशे गाड्या गुहागर तालुक्यात येण्याचे नियोजन झाले आहे.

तर गुहागर तालुक्यातून परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत 150 गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यामध्ये 50 गाड्या ऑनलाईन तर 100 गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. 2 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास होणार आहे. त्यामुळे या गाड्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होईल. मुंबई, बोरीवली, ठाणे, नालासोपारा, विठ्ठलवाडी, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड अशा एस. टी. फेऱ्या आहेत.

नालासोपारा येथील चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी वाहन मिळावे याकरिता गुहागर आगारातील वाहतूक नियंत्रक नालासोपारा डेपोमध्ये पाठविण्यात आले असून त्यांच्या मार्फतही परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकिंग घेतले जात आहे.

त्याचबरोबर 27 ऑगस्टपासून गुहागर आगारातून बोरीवली व पिंपरी-चिंचवड अशा दोन जादा एस. टी. फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडकरीता शिवशाही वाहतूक करणार आहे. ग्रुप बुकिंग व्यतिरिक्त दररोज सकाळी व सायंकाळी मुंबई, भांडूप, नालासोपारा, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

गुहागर आगारात दाखल होणाऱ्या वाहनांना गुहागर आगार व पोलिस परेड मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील साईट पट्टी खोदाई झाल्याने शृंगारतळी येथे पार्किंगसाठी खासगी जागा घेतली जाणार आहे. येणाऱ्या चालक-वाहकांची शहरातील भंडारी भवन सभागृहात राहण्याची व्यवस्था केली जात असून याबाबत सभागृह चालकांबरोबर बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गुहागर आगारात केवळ 64 एस. टी. गाड्या असून नियमित फेऱ्या कायम ठेवून बाहेरून येणाऱ्या गाड्यांच्या माध्यमातून चाकरमान्यांना परतीची सेवा दिली जाणार आहे.

 

 
Comments
Add Comment

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे