Mumbai Heavy Rain: दहीहंडीच्या दिवशीच पाऊसाची जोरदार हजेरी, मुंबईत अनेक भागात साचले पाणी, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत

दहीहंडीच्या उत्सवासाठी लोकांची संभाव्य गर्दी पाहता हवामान खात्याचे घराबाहेर न पडण्याचे आवाहन 


मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट आणि ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अति मुसळधार पाऊस रात्रीपासून सुरू आहे.


दरम्यान विक्रोळी परिसरात दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोघे जखमी झाले आहेत. कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये अनुक्रमे ४५.२ मिमी आणि ११.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार समुद्री वाऱ्यांमुळे मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.



रेल्वे ट्रॅकवर साचले पाणी, रेल्वे वाहतूक व्यवस्था विस्कळीत


काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हार्बल तसेच मध्य रेल्वे मार्गिकेवरील काही ट्रॅकवर पाणी साचू लागले आहेत. मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.  रेल्वे प्रशासनाने पाणी काढण्यासाठी पंप लावले असले तरी पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच किंग्ज सर्कल, दादर, माटुंगा आणि सायन यांसारख्या सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूकही मंदावली आहे.


पुढील २४ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता असून, दहीहंडीच्या उत्सवासाठी लोकांची संभाव्य गर्दी पाहता हवामान खात्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन लोकांना केले आहे.



पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकण प्रदेशासह इतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस


महाराष्ट्रातील वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती आहे, तर बीडमधील जिल्हा रुग्णालयाचे जीर्ण छत कोसळल्याने एक रुग्ण जखमी झाला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकण प्रदेशासह देशाच्या इतर भागात मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत