मुंबईत मुसळधार पाऊसामुळे दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आज पहाटे शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची बातमी आहे.


विक्रोळी पार्कसाईट या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची शक्यता असते, यंदाच्या पावसाळ्यापूर्वीही महानगरपालिकेने हा भाग धोकादायक म्हणून घोषित केला होता, त्यामुळे येथे राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही इथे अनेक लोकं राहत होती. दरम्यान कालपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे या भागात दरड कोसळण्याची घटना घडली. यात मिश्रा कुटुंबीयांचे घर दरडीखाली गाडले गेले. ज्यामध्ये मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मिश्रा कुटुंबांच्या घरावर दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. बचावकार्यानंतर मिश्रा कुटुंबीयांना दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, सुरेश मिश्रा (वय ५०) आणि शालू मिश्रा ( वय १९) या बापलेकीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (वय ४५) आणि ऋतुराज मिश्रा (वय २०) या आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


या दुर्घटनेनंतर आता पालिकेकडून दरड कोसळलेल्या आजुबाजूच्या भागातील घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. डोंगराची माती भुसभुशीत होऊन आणखी एखादी दुर्घटना घडू नये, यादृष्टीने पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे.


गेल्या महिन्यात, मुंबईतील भांडुपमध्ये काही तासांच्या मुसळधार पावसानंतर एका निवासी भागात दरड कोसळण्याची घटना घडली होती. मात्र त्या भागातील काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती, ज्यामुळे कोणतीही दुखापत झाली नव्हती.

दरम्यान, शनिवारी मध्य रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे शहरात अनेक भागात पाणी साचू लागले आहे.  भारतीय हवामान खात्याने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसह अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, पुणे, सातारा आणि जळगाव येथे मुसळधार पाऊस आणि वादळासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Valvan Mahotsav 2026 : महिला बचत गटांच्या हाताची चव पोहोचणार थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत

येत्या ११ आणि १२ मे २०२६ रोजी ‘वाळवण महोत्सव' मुंबई (विशेष प्रतिनिधी) महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना

Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) हुतात्मा स्मारकाच्या (Hutatma Smarak Chowk) सुशोभिकरणाच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात चांगलीच

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना दिला चेकमेट; प्राधान्य क्रम नाकारलेला प्रस्ताव बहुमताने केला मंजूर

वडाळ्यातील आझादनगर, कमलानगर पुनर्विकास प्रकल्पाला मिळणार गती मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत वडाळा

SSC Result 2026 : महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

यंदा ७७ शाळांचा निकाल १०० टक्के; ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मुंबई (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र

World Thalassemia Day : जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून, महापौर आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केले रक्तदान

रक्त कमतरता (थॅलेसेमिया) ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदानाबाबत जनजागृतीचा कृतिशील संदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी

Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, ठाणे आणि मुलुंड