Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने या विकास प्रवासाला साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून विकासकामांचा आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला.

स्वातंत्र्यदिनाच्या विविध कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यात हजर असलेले मंत्री लोढा यांनी गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारत येथे आयोजित “विकसित भारताचा अमृत काळ: सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११  वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा” या मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. हा उपक्रम माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि जिल्हा प्रशासन गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, तसेच जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रदर्शन पाहिल्यानंतर ते म्हणाले की, “मोदी सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यांवर लक्ष केंद्रित करून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विकासात अडथळे आणणाऱ्या शत्रुराष्ट्रांच्या डावांना आपल्या जवानांनी हाणून पाडले आहे.” प्रदर्शनात मागील ११ वर्षांतील महत्त्वपूर्ण प्रकल्प, योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी ही माहिती जाणून घेऊन भारताच्या प्रगतीत आपला हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी  जिरुटोला या आदिवासी गावाला भेट देऊन स्थानिक युवकांना रोजगार, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यानंतर, माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस शिपाई सागर राऊत यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांनी सांत्वनपर विचारपूस केली आणि त्यांच्या शौर्याची आठवण केली. आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात दर्शन घेऊन समाजबांधवांना धार्मिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण करून मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. धान खरेदी, बोनस वितरण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मनरेगा आणि महसूल सप्ताह अशा योजनांची अंमलबजावणी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सुरूवातीसंदर्भात त्यांनी विशेष भर दिला.
Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह