रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या पालकमंत्रीपदावर कुठल्याही मंत्र्‍याची नियुक्ती केली नसली तरी देखील 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे.

शासनाने परिपत्रक जारी करत कोणत्या मंत्र्‍यांनी कुठे ध्वजारोहण करायचे हे सांगितलं आहे. त्यामुळे, आता पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना मिळणार असल्याची चर्चा पुन्हा होत आहे. यामुळे मंत्री भरत गोगावले यांचा सूरही बदलले आहेत. भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपद किस बात की चीज है... असे म्हणत आपला दावाच सोडल्याचं दिसून आलं.

''ज्या मावळ्यांनी अडीच वर्षासाठी मंत्रिपद सोडले त्याला पालकमंत्री किस बात की चीज है, असे म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरुन आपली भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या इतिहासात पालकमंत्रिपद सोडण्याने इतिहासात माझं नाव कोरलं गेले आहे.

मात्र मुख्यमंत्री आणि मी सुद्धा मंत्री व्हायला पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी केलं नाही,'' असे म्हणत भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर आपला रोष दर्शवला. दरम्यान, महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे वजन कमी पडताना दिसत आहे का? असा सवाल भरत गोगावले यांना विचारला असता, अस अजिबात नाही. एकनाथ शिंदेंचे वजन कमी पडले असते तर आम्ही उठाव केलेल्या पालकमंत्री पदावर स्टे आला नसता, असेही गोगावले यांनी म्हटले.
Comments
Add Comment

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात