राजस्थान: खाटूश्यामजी मंदिरातून परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात, १० ठार


जयपूर: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खाटूश्यामजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ७ मुले आणि ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत.


मनोहरपूर राष्ट्रीय महामार्गावर सैंथल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापी गावाजवळ हा अपघात घडला. भाविक एका पिकअप गाडीतून प्रवास करत होते. याच वेळी त्यांची गाडी एका कंटेनरला धडकली. या धडकेत पिकअप गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.


घटनेची माहिती मिळताच सैंथल पोलिसांचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.


हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील एटाह येथील रहिवासी होते आणि ते खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.


Comments
Add Comment

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर