राजस्थान: खाटूश्यामजी मंदिरातून परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात, १० ठार


जयपूर: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खाटूश्यामजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ७ मुले आणि ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत.


मनोहरपूर राष्ट्रीय महामार्गावर सैंथल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापी गावाजवळ हा अपघात घडला. भाविक एका पिकअप गाडीतून प्रवास करत होते. याच वेळी त्यांची गाडी एका कंटेनरला धडकली. या धडकेत पिकअप गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.


घटनेची माहिती मिळताच सैंथल पोलिसांचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.


हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील एटाह येथील रहिवासी होते आणि ते खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.


Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा