Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार आहेत. या दरम्यान गणेशोत्सव असल्याकारणामुळे मुंबईत ऐन सणासुदीच्या वेळेत जरांगेचा जाळपोळ करण्याचा आणि दंगली घडवून आणण्याचा प्रोग्राम असल्याचा  खळबळजनक आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.


मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील मराठा समाजाबरोबर मुंबईत दिनांक २९ ऑगस्टला कूच करणार आहेत . यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर टीका केली. बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती देखील केली आहे.



जरांगे पाटील यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती करत जरांगे पाटील यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या. पण महाराष्ट्रात सणासुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा डाव जरांगे पाटील यांना करायचा तो प्रयत्न रोखावा, अशी मागणी देखील हाके यांनी केली. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर लक्ष्मण हाके हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.



शरद पवारांच्या मंडल आयोगावर टिका


महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे हा एकमेव कार्यक्रम शरद पवार (Sharad Pawar) आणि जरांगे पाटील यांचा आहे. जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून प्रशासनाने वेगळा निर्णय घेतला तर त्याला ओबीसी समाज प्रत्युत्तर देईल, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी असून ओबीसींना वेड्यात आणि मुर्खात काढण्याचा प्रयत्न शरद पवार पक्षाचा असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.


लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, मनोज जरांगेंची भाषा चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबलं पाहिजे. बेकायदेशीर मागणी करत असताना त्यांचे लाड का केले जातात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर जरांगे पाटील यांनी थोडासा अभ्यास करून हिंदी विषयाचे अवलोकन करावे, असा सल्ला देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात