'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा


मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघावर टीका करताना जाधव यांची जीभ धसरली. जाधव यांनी "ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री" असे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाज आक्रमक झाला असून, जाधव यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, भास्कर जाधव यांनी माझी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल, पण मी माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.



जाधव यांची माफी मागण्यास ठाम नकार


मुंबईत झालेल्या एका मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल केला. त्यांनी संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनशाम जोशी यांना 'बेडकाची उपमा' दिली. यानंतर "ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात" अशी टिप्पणीही त्यांनी केली. यामुळेच ब्राह्मण समाज संतापला आहे. यावर जाधव म्हणाले की, "मी गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची मला चिंता नाही, माझी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल."



'राजकीय षडयंत्राचा भाग'


जाधव यांनी आरोप केला की, त्यांना निवडणुकीत हरवण्यासाठी विविध समाजांना त्यांच्या विरोधात भडकवण्यात आले होते. तसेच, 'वंचित आघाडी'च्या अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्यात त्यांचे नाव जाणूनबुजून गोवण्यात आले. त्यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर निशाणा साधत म्हटले की, "घनशाम जोशी यांनी पक्ष म्हणून पत्र लिहिले असते तर ठीक होते, पण समाज म्हणून पत्र लिहिल्याचे वाईट वाटले. माझ्या विरोधात जिल्ह्यात किंवा राज्यात कुठेही पत्र द्या, मी ते गटारात फेकून देतो."



कुणबी समाजाला सावध राहण्याचा इशारा


भास्कर जाधव यांनी यावेळी गुहागरमधील कुणबी समाजालाही सावध राहण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, "मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकले जाईल. तुमच्या घरात पूजा सांगायला कोणी आले नाही तर घाबरू नका, मी स्वतः पूजा सांगायला येईन." त्यांनी कुणबी समाजाचे नेते रामभाऊ बेंडल यांच्या एकाच वेळी निवडून येण्याचा संदर्भ देत, समाजात फूट पाडून नेतृत्वाला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला.


जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "गेल्या निवडणुकीत माझ्यावर जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप करून ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पेट्रोल बॉम्बने माझ्या घरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला." त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असतानाही, रत्नागिरीचे एसपी धनंजय कुलकर्णी यांनी पुरावा न मिळाल्याने मला अटक केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'आतापर्यंत मी शांत होतो, पण आता कोणाला सोडणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.


दरम्यान, मंगळवारी जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “मी कुठेही समाजाबद्दल अवाक्षर बोललेलो नाही. माझ्या भाषणाचा रोख गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघावर होता, संपूर्ण समाजावर नव्हता. तरीही त्यांनी समाजाच्या वतीने निषेधाचे पत्र दिले. मग मी माफी कसली मागायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या

Ekvira Devi Karla : आई एकवीरा देवीच्या खजिन्यावर अध्यक्षांचा डल्ला? दागिने आणि रोकड हडपल्याचा पुजाऱ्याचा खळबळजनक आरोप!

लोणावळा : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान (Ekvira Devi Karla) ट्रस्टमध्ये गेल्या

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार