Pune Accident: श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणारी पिकअप दरीत कोसळली, ६ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी

खेड: पुण्यातील खेड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त महिला भाविकांनी खच्चून भरलेली पीकअप दरीत कोसळली. या पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक महिला प्रवासी बसले होते, ज्यामुळे कुंडेश्वर मंदिराकडे जाताना नागमोडी वळणावर घाट चढताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली.


या दुर्दैवी अपघातात ६ महिलांचा मृत्यू झाला तर २० महिलांची परिस्थिती चिंताजनक आहे. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे.



 

आज श्रावण महिन्याच्या तिसरा सोमवार असून, या निमित्ताने महिला भाविक कुंडेश्वरच्या दर्शनासाठी ज्या पिकअपने जात होत्या, त्या पिकअपमध्ये तब्बल ३० ए ३५ महिला भाविक प्रवास करत होत्या. या दरम्यान नागमोडी वळणावर घाट चढताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप जीप पलटली, या पिकअपने ५ ते ६ पलटी खाल्ल्यामुळे त्यातील महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं.

Comments
Add Comment

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर!

मराठवाड्यासह विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होणार मुंबई : पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच जाता-जाता

बंदरे विकास आणि जहाज बांधणी क्षेत्रात राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे - मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वक्तव्य

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संभाजी भिडे

चंद्रपूर - वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे धक्के

चंद्रपूर : वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून वरोरा भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले आहे. दरम्यान ३.२

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार - मुख्यमंत्री

दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार लातूर : राज्यात अनेक ठिकाणी

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान