खाडी बुजवली, मासेमारी संपली…!

कोळी समाजाच्या उपजीविकेवर ‘विकासा’चे काळे वादळ


ठाणे  : ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या उपजीविकेला विकासाच्या नावाखाली मोठा धक्का बसत आहे. खाडी व खाजण क्षेत्रांमध्ये झपाट्याने चाललेल्या शहरविकास, बंदर प्रकल्प, खाडी भराव आणि औद्योगिक अतिक्रमणामुळे मासेमारीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक पर्यावरण दिवसेंदिवस नष्ट होत चालले आहे. त्यामुळे शतकानुशतक चालत आलेला कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून, रोजगाराचा मुख्य आधार हिरावला जात आहे.


या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय कोळी समाज (नोंदणीकृत), दिल्लीच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी, ठाणे यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण २०२० चा संदर्भ देत, पारंपरिक मासेमारीस पूरक वातावरण निर्माण करण्याच्या मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, खाडी किनाऱ्यावर वास्तव्यास असलेल्या कोळी समाजाचे जीवनचक्र पूर्णतः मासेमारीवर आधारित आहे. मात्र सध्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या प्रकल्पांमुळे त्यांचे नैसर्गिक जलस्रोत, जाळी टाकण्याच्या जागा, मासे प्रजनन क्षेत्रे आणि विक्रीसाठी लागणाऱ्या सुविधा या सगळ्याच गोष्टी बुडीत चालल्या आहेत. परिणामी शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, मच्छीमार समाजात अदृश्य बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.


या निवेदनावर ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद कोळी यांच्या स्वाक्षरीसह मागण्या सादर केल्या गेल्या असून, शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पारंपरिक मासेमारीस पुनरुज्जीवित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा

मीरा-भाईंदरमध्ये आम्ही ८७ जागा लढवू !

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अटी; महायुतीत खळबळ भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर

ठाण्यात भाजप-शिवसेना युतीवर आजची डेडलाईन

भाजप स्वबळावर जाण्यास तयार ठाणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ठाण्यात

भिवंडीसाठी ठाकरे बंधूंचे ठरले

पहिल्यांदाच सर्व ९० जागा लढणार, भाजप-शिवसेनेला आव्हान भिवंडी : भिवंडी महापालिकेत ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्र

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास