भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य


कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पाऊले टाकत आहे. मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा कट रचला जात आहे.


मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा'' असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबईचे माजी संचालक आयआरएस समीर वानखेडे यांनी कल्याण येथे केले. येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच ॲड. शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मिशन नशामुक्त' कार्यक्रमात ते बोलत होते.


या कार्यक्रमाला केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार, यंग इंडिया कल्याणच्या ॲड. शिवानी कांबळे, श्री सदस्य यतीन चाफेकर, के. सी. गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन यांच्यासह कल्याणातील ज्येष्ठ मंडळी, शालेय - महाविद्यालयीन शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


''कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक, मानसिक नुकसान होत नाही. तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेत.


आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २० टक्के जनता ही तरुण आहे. केवळ तरुणच नाहीये तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्र्वासही आहे. त्यामुळेच तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकवटण्यासाठी अंमली पदार्थांच्या व्यसनात ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी यावेळी केला.

Comments
Add Comment

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला

कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकता ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा

ये पब्लिक है, सब जानती है!

केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर कल्याण  : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो,

ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी