पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

  47

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात संभाजी देशमुख यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.


यापूर्वीही संभाजी देशमुख यांना २०१६ मध्येही जाहीर झालेले राष्ट्रपती पदक राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सन २०१८ ला देण्यात आले होते. २८ जुलै रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


सध्या राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेल्या संभाजी नारायण देशमूख यांनी पोलीस दलामध्ये ठाणे शहर आयुक्तालय, अँन्टीकरप्शन विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई - कल्याण या प्रमुख ठिकाणी रश्मी शूक्ला, आशूतोष डूंबरे, श्रीकांत सावरकर, फत्तेसिह पाटील, छेरींग दोरजे, किशोर जाधव, दिपक साकोरे, संदिप जाधव, पराग मणेरे आदी वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनामध्ये उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे.


दुसऱ्यांदा मिळालेल्या मानाच्या राष्ट्रपती पोलीस पदकाबद्दल संभाजी देशमुख यांच्यावर पोलीस अधिकारी, शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव
होत आहे.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर