सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता, शोध सुरू

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या छावणीतून सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता झाला आहे. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२५ च्या रात्री सीमा सुरक्षा दलाचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. छावणी भोवतालच्या परिसरात शोधाशोध झाली. जवान सापडला नाही. अखेर जवान बेपत्ता असल्याची लेखी तक्रार सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांकडे नोंदवली आहे. सीमा सुरक्षा दलाने संबंधित जवानाचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित आवश्यक ती माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर जवानाचा शोध सुरू केला आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या बटालियनचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला आहे. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये आणि मे २०२४ मध्ये सीमा सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक जवान बेपत्ता झाला होता. मानसिक ताण असह्य झाल्यामुळे या घटना घडल्या होत्या. संबंधित जवान ड्युटीवरुन परस्पर बाहेर निघून गेले होते. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.
Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या