सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता, शोध सुरू

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या छावणीतून सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता झाला आहे. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२५ च्या रात्री सीमा सुरक्षा दलाचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. छावणी भोवतालच्या परिसरात शोधाशोध झाली. जवान सापडला नाही. अखेर जवान बेपत्ता असल्याची लेखी तक्रार सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांकडे नोंदवली आहे. सीमा सुरक्षा दलाने संबंधित जवानाचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित आवश्यक ती माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर जवानाचा शोध सुरू केला आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या बटालियनचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला आहे. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये आणि मे २०२४ मध्ये सीमा सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक जवान बेपत्ता झाला होता. मानसिक ताण असह्य झाल्यामुळे या घटना घडल्या होत्या. संबंधित जवान ड्युटीवरुन परस्पर बाहेर निघून गेले होते. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.
Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे