सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता, शोध सुरू

  51

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या छावणीतून सीमा सुरक्षा दलाचा जवान बेपत्ता झाला आहे. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२५ च्या रात्री सीमा सुरक्षा दलाचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. छावणी भोवतालच्या परिसरात शोधाशोध झाली. जवान सापडला नाही. अखेर जवान बेपत्ता असल्याची लेखी तक्रार सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांकडे नोंदवली आहे. सीमा सुरक्षा दलाने संबंधित जवानाचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित आवश्यक ती माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर जवानाचा शोध सुरू केला आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या बटालियनचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला आहे. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये आणि मे २०२४ मध्ये सीमा सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक जवान बेपत्ता झाला होता. मानसिक ताण असह्य झाल्यामुळे या घटना घडल्या होत्या. संबंधित जवान ड्युटीवरुन परस्पर बाहेर निघून गेले होते. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या