महाराष्ट्रातील निवडणूक निष्पक्ष, तपासणीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट निर्दोष आढळले – निवडणूक आयोग

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत वापरलेले सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणीत योग्य असल्याचे आढळले. त्यामुळे निवडणूक निष्पक्ष असून निकालांबात शंकेला वाव नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधीसह आपपल्या मतदारसंघात पराभूत झालेल्या १० उमेदवारांच्या तक्रारींनंतर आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात आले.


राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी १० उमेदवारांच्या विनंतीनुसार १० मतदारसंघांमध्ये क्रॉस-चेकिंग केले. या प्रक्रियेत ८ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. तर, दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले. यावेळी एकूण ४८ मतदार युनिट, ३१ नियंत्रण यंत्रे आणि ३१ व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. त्याचप्रमाणे, निवडक मतदारसंघांमधील उमेदवारांच्या विनंतीवरून मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली.


राज्यातील कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला आणि माजलगाव या काही मतदारसंघांमध्ये मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचण्या करण्यात आल्या. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगावमध्ये निदान चाचणीसह मॉक पोलही घेण्यात आला. सर्व चाचण्यांदरम्यान ईव्हीएम यंत्रे योग्य प्रकारे कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निवडणूक निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा

BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०,९५२ कोटी रुपयांचा

करमणूक शुल्क, फेरीवाल्यांना क्यूआर प्रमाणपत्र आणि निधीसाठी महापालिका बाँड्स काढणार महापालिका आयुक्त डॉ भूषण

मुलांचे 'डिजिटल व्यसन' सुटणार! राज्य सरकारकडून तज्ज्ञांची 'टास्क फोर्स' नियुक्त; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत