आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडी कारवाई; बदलीनंतर दुसऱ्याच दिवशी १२ ठिकाणी छापे

विरार: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कारवाई केली. वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर ईडीने पहाटेपासून पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ही छापेमारी मुंबई, नाशिक आणि वसई-विरार या तीन ठिकाणी करण्यात आली. विशेष म्हणजे, बहुसंख्य ठिकाणे पवार यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.



छाप्यांची मोहीम अत्यंत गोपनीयपणे राबवण्यात आली असून ती संपूर्ण दिवसभर सुरू होती. माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


विशेष म्हणजे, सोमवारी अनिलकुमार पवार यांचा वसई-विरार महापालिकेमधून निरोप समारंभ पार पडला होता. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच ईडीने त्यांच्या घरी आणि इतर ठिकाणी छापे टाकल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.


सध्या पवार यांची बदली ठाण्यातील एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) विभागात करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे