आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडी कारवाई; बदलीनंतर दुसऱ्याच दिवशी १२ ठिकाणी छापे

  65

विरार: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कारवाई केली. वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर ईडीने पहाटेपासून पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ही छापेमारी मुंबई, नाशिक आणि वसई-विरार या तीन ठिकाणी करण्यात आली. विशेष म्हणजे, बहुसंख्य ठिकाणे पवार यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.



छाप्यांची मोहीम अत्यंत गोपनीयपणे राबवण्यात आली असून ती संपूर्ण दिवसभर सुरू होती. माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


विशेष म्हणजे, सोमवारी अनिलकुमार पवार यांचा वसई-विरार महापालिकेमधून निरोप समारंभ पार पडला होता. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच ईडीने त्यांच्या घरी आणि इतर ठिकाणी छापे टाकल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.


सध्या पवार यांची बदली ठाण्यातील एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) विभागात करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.