Kalyan: रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी गोकुळ झा ला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण: रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी ही दोघं दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत होती, जी शुक्रवारी संपली.


गोकुळ हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली होती. आडिवली-ढोकळी भागात बिल्डिंगमध्ये पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या कामगारावर गोकुळ आणि त्याच्या काही साथीदारांनी धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप होता. या गुन्ह्यात गोकुळ फरार होता. त्यामुळे या प्रकरणात पाेलिसांनी त्याचा ताबा न्यायालयाकडून घेतला. गोकुळला शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.



गोकुळची पत्रकारांना धमकी


गोकुळने बुधवारी न्यायालयात अरेरावी केली होती. शुक्रवारीही त्याची मुजोरी पाहायला मिळाली. त्याला मानपाडा पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेताना त्याने बेड्या घालण्यास नकार दिला. तसेच, चेहऱ्यावर फडके गुंडाळण्यास मनाई करत पोलिसांशी देखील वाद घातला. त्यानंतर त्याने कोठडीतून बाहेर आल्यावर स्थानिक पत्रकारांना ‘तुम्ही चुकीचे केलेय, आपली लवकरच भेट होईल,’ अशी धमकीही दिली.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच