Kalyan: रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी गोकुळ झा ला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  54

कल्याण: रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी ही दोघं दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत होती, जी शुक्रवारी संपली.


गोकुळ हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली होती. आडिवली-ढोकळी भागात बिल्डिंगमध्ये पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या कामगारावर गोकुळ आणि त्याच्या काही साथीदारांनी धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप होता. या गुन्ह्यात गोकुळ फरार होता. त्यामुळे या प्रकरणात पाेलिसांनी त्याचा ताबा न्यायालयाकडून घेतला. गोकुळला शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.



गोकुळची पत्रकारांना धमकी


गोकुळने बुधवारी न्यायालयात अरेरावी केली होती. शुक्रवारीही त्याची मुजोरी पाहायला मिळाली. त्याला मानपाडा पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेताना त्याने बेड्या घालण्यास नकार दिला. तसेच, चेहऱ्यावर फडके गुंडाळण्यास मनाई करत पोलिसांशी देखील वाद घातला. त्यानंतर त्याने कोठडीतून बाहेर आल्यावर स्थानिक पत्रकारांना ‘तुम्ही चुकीचे केलेय, आपली लवकरच भेट होईल,’ अशी धमकीही दिली.

Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक