माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मंगळवारी निर्णय

विजय घाडगे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन


पुणे : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मंगळवारी निर्णय घेणार, तसेच सूरज चव्हाणला पुन्हा पक्षात घेणार नाही, असे आश्वासन दिल्याची माहिती छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी दिली. दोन्ही विषयाच्या अनुषंगाने घाडगे यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात उपरोक्त विषयावर चर्चा झाली.


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाच एक व्हिडीओ समोर आला होता, हा व्हिडीओ समोर येताच राज्यात वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात आली. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. तर दुसरीकडे हा व्हिडीओ समोर आल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेने या प्रकरणी त्यांना निवेदन दिले, तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून तटकरे जिथे बसले होते, तिथे त्यांच्या टेबलवर पत्ते फेकण्यात आले. यानंतर तटकरे यांच्यासमोरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सूरज चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचं पाहायला मिळाले. यावेळी विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर आता विजय घाडगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.



अजित पवार यांनी विजय घाडगे यांच्यासोबत चर्चा केली. पवार यांच्या भेटीनंतर घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात येत्या मंगळवारपर्यंत आपण निर्णय घेऊ, असा शब्द आपल्याला अजित पवार यांनी दिल्याचं घाडगे यांनी सांगितले. तसेच सूरच चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मंगळवारपर्यंत वाट पाहाणार, अन्यथा मंगळवारनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार, असा इशारा यावेळी घाडगे यांनी दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात पक्षात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. ज्यामुळे पक्षाला मोठा फटका बसू शकतो. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, माणिकराव कोकाटे चार वेळा आमदार झालेले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना राजीनामा नको, तर वेगळी जबाबदारी दिली जावी.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात