गर्भवती महिलेचा झोळीतून तब्बल एक किमी प्रवास

आसनगाव : डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील गर्भवती महिलेला रस्त्याअभावी झोळीतून तब्बल एक किमी प्रवास करावा लागला. शहापूर तालुक्यातील महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. त्यातच भवरपाडा व परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने महिलेला खासगी गाडीतून शहापूर उप-जिल्हा रुग्णालय गाठावे लागले. संबंधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. शहापूरचे शुक्लकाष्ठ कधी संपणार हा प्रश्न आदिवासींना पडला आहे.


तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, फुगाळे ग्रामपंचायतीमधील वरसवाडी येथील महिलांनी या समस्येचा सामना केला आहे. भवरपाडा येथील मनीषा भवर या महिलेला मंगळवारी दुपारी पोटात कळा येऊ लागल्या. धो-धो पाऊस, नेटवर्क अभावी संपर्क नाही त्यातच मुख्य रस्त्यापर्यंत किमान एक किमीचा रस्ता या महिलेला झोळीतून चिखलवाटेने प्रवास करत पार करावा लागला.


पारधीपाड्यापर्यंत आणून शहापूर उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, वांद्रे ग्रामपंचायत अंतर्गत भवरपाडा, दोडकेपाडा व आलनपाडा येथे वनजमिनीच्या अडचणीमुळे या पाड्यांवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे तेथील सरपंच मारुती साठे यांनी सांगितले. गेल्या तीन - चार वर्षांपासून रस्त्याला अडचण ठरणाऱ्या वनजमिनीचा प्रस्ताव सादर करूनही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आदिवासींना
कसरत करावी लागते.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच