गर्भवती महिलेचा झोळीतून तब्बल एक किमी प्रवास

आसनगाव : डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील गर्भवती महिलेला रस्त्याअभावी झोळीतून तब्बल एक किमी प्रवास करावा लागला. शहापूर तालुक्यातील महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. त्यातच भवरपाडा व परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने महिलेला खासगी गाडीतून शहापूर उप-जिल्हा रुग्णालय गाठावे लागले. संबंधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. शहापूरचे शुक्लकाष्ठ कधी संपणार हा प्रश्न आदिवासींना पडला आहे.


तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, फुगाळे ग्रामपंचायतीमधील वरसवाडी येथील महिलांनी या समस्येचा सामना केला आहे. भवरपाडा येथील मनीषा भवर या महिलेला मंगळवारी दुपारी पोटात कळा येऊ लागल्या. धो-धो पाऊस, नेटवर्क अभावी संपर्क नाही त्यातच मुख्य रस्त्यापर्यंत किमान एक किमीचा रस्ता या महिलेला झोळीतून चिखलवाटेने प्रवास करत पार करावा लागला.


पारधीपाड्यापर्यंत आणून शहापूर उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, वांद्रे ग्रामपंचायत अंतर्गत भवरपाडा, दोडकेपाडा व आलनपाडा येथे वनजमिनीच्या अडचणीमुळे या पाड्यांवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे तेथील सरपंच मारुती साठे यांनी सांगितले. गेल्या तीन - चार वर्षांपासून रस्त्याला अडचण ठरणाऱ्या वनजमिनीचा प्रस्ताव सादर करूनही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आदिवासींना
कसरत करावी लागते.

Comments
Add Comment

हार्बरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बेलापूर-पनवेलदरम्यान १२ तासांचा ब्लॉक

बेलापूर : हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामं करायची असल्यामुळे बेलापूर ते पनवेल दरम्यान बारा

कॅप्सुल गोळ्यांमध्ये अळ्या!

महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्क कल्याण : कल्याणमध्ये अॅसिडिटीच्या त्रासासाठी दिलेल्या गोळ्यांमध्ये अळ्या

पत्नीने मुलाच्या मदतीने केली पतीची हत्या

भाईंदर : भाईंदर येथे सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराला कारखान्यात धारदार शस्त्राने ठार मारणाऱ्या

चालकाला हृदयविकाराचा झटका आणि अंबरनाथमध्ये घडला थरकाप उडवणारा अपघात!

ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील

सोसायटीच्या परवानगीविना विकासकाला मजला वाढविण्याची परवानगी

बांधकाम परवानगी रद्द करण्याची रहिवाशांची मागणी कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली पालिकेचा अजब कारभार समोर

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या