गर्भवती महिलेचा झोळीतून तब्बल एक किमी प्रवास

आसनगाव : डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील गर्भवती महिलेला रस्त्याअभावी झोळीतून तब्बल एक किमी प्रवास करावा लागला. शहापूर तालुक्यातील महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. त्यातच भवरपाडा व परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने महिलेला खासगी गाडीतून शहापूर उप-जिल्हा रुग्णालय गाठावे लागले. संबंधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. शहापूरचे शुक्लकाष्ठ कधी संपणार हा प्रश्न आदिवासींना पडला आहे.


तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, फुगाळे ग्रामपंचायतीमधील वरसवाडी येथील महिलांनी या समस्येचा सामना केला आहे. भवरपाडा येथील मनीषा भवर या महिलेला मंगळवारी दुपारी पोटात कळा येऊ लागल्या. धो-धो पाऊस, नेटवर्क अभावी संपर्क नाही त्यातच मुख्य रस्त्यापर्यंत किमान एक किमीचा रस्ता या महिलेला झोळीतून चिखलवाटेने प्रवास करत पार करावा लागला.


पारधीपाड्यापर्यंत आणून शहापूर उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, वांद्रे ग्रामपंचायत अंतर्गत भवरपाडा, दोडकेपाडा व आलनपाडा येथे वनजमिनीच्या अडचणीमुळे या पाड्यांवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे तेथील सरपंच मारुती साठे यांनी सांगितले. गेल्या तीन - चार वर्षांपासून रस्त्याला अडचण ठरणाऱ्या वनजमिनीचा प्रस्ताव सादर करूनही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आदिवासींना
कसरत करावी लागते.

Comments
Add Comment

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह