बांगलादेश विमान अपघातांच्या मदतीला धावला भारत, जखमींसाठी डॉक्टरांची टीम पाठवणार

ढाका येथील विमान अपघातातील जखमींसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवणार असल्याचे भारताने केले जाहीर


नवी दिल्ली: अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाची जखम ताजी असतानाच, बांगलादेश येथील विमान अपघात घटनेचा सर्वांनाच धक्का बसला आहे. बांगलादेशी हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी लढाऊ विमान ढाका येथील शाळा आणि महाविद्यालयाच्या इमारतीशी आदळून खाली कोसळले. या अपघातात मोठ्या संख्येने शालेय तसेच महाविद्यालयीन मुलांचा मृत्यू झाला. बांगलादेश वर कोसळलेल्या या संकटाच्या काळात शेजार धर्म म्हणून, भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. बांगलादेशातील विमान अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी विशेष डॉक्टर आणि परिचारिकांची टीम पाठवली जात असल्याचे भारताने म्हटले आहे.



बांगलादेशला भारताकडून वैद्यकीय मदत


भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी याबद्दल माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "'बर्न-स्पेशालिस्ट' डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक लवकरच आवश्यक वैद्यकीय मदत घेऊन बांगलादेशातील ढाका येथे जाईल. बर्न-स्पेशालिस्ट डॉक्टर हे भाजलेल्या जखमांवर उपचार करण्यात तज्ज्ञ आहेत. ही टीम रुग्णांच्या स्थितीचे मूल्यांकन करेल आणि गरजेनुसार भारतात पुढील उपचार आणि विशेष काळजी घेण्याची शिफारस करेल." मिळालेल्या माहितीनुसार, ढाका येथे जाणाऱ्या पथकात दिल्लीतील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. त्यापैकी एक राम मनोहर लोहिया रुग्णालयातील आहे आणि दुसरे सफदरजंग रुग्णालयातील आहेत.



अपघात कसा घडला?


खरं तर, सोमवार, २१ जुलै रोजी बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी लढाऊ विमान ढाका येथील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर आदळून खाली कोसळले. या अपघाताचे भयानक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. आतापर्यंत या विमान अपघातात किमान ३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातादरम्यान शालेय वर्ग सुरु होते, त्यामुळे मृतांमध्ये २५ मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.



पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाका येथील विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच बांगलादेशला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदींनी एक्स वर म्हटले आहे- "ढाका येथील दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीमुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे. यात बरेच तरुण विद्यार्थी होते. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबांसोबत आहेत. अपघातात जखमीं झालेले लवकरात लवकर बरे होवो यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या काळात भारत बांगलादेशसोबत एकजुटीने उभा आहे आणि सर्व शक्य मदत तसेच पाठिंबा देण्यास तयार आहे."

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक