पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या; पप्पा दार उघडत नाहीत, म्हणत मुलांची शेजाऱ्यांना विनवणी... पोलिसांना पाचारण

 पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाहतूक शाखेतील हवालदार राजेंद्र गायकवाड (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. धानोरी, लोहगाव येथील त्यांच्या घरी शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या निधनामुळे कुटुंब आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


ही घटना त्यावेळी समोर आली जेव्हा गायकवाड यांची १२ आणि १४ वर्षांची दोन मुले शाळेतून घरी परतली आणि त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या. त्यांच्या आईने वारंवार फोन करूनही राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. मुलांनी शेजाऱ्यांची मदत मागितली आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, राजेंद्र गायकवाड यांनी घरातच गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.


विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी