पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या; पप्पा दार उघडत नाहीत, म्हणत मुलांची शेजाऱ्यांना विनवणी... पोलिसांना पाचारण

 पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाहतूक शाखेतील हवालदार राजेंद्र गायकवाड (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. धानोरी, लोहगाव येथील त्यांच्या घरी शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या निधनामुळे कुटुंब आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


ही घटना त्यावेळी समोर आली जेव्हा गायकवाड यांची १२ आणि १४ वर्षांची दोन मुले शाळेतून घरी परतली आणि त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या. त्यांच्या आईने वारंवार फोन करूनही राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. मुलांनी शेजाऱ्यांची मदत मागितली आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, राजेंद्र गायकवाड यांनी घरातच गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.


विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात