पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या; पप्पा दार उघडत नाहीत, म्हणत मुलांची शेजाऱ्यांना विनवणी... पोलिसांना पाचारण

 पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाहतूक शाखेतील हवालदार राजेंद्र गायकवाड (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. धानोरी, लोहगाव येथील त्यांच्या घरी शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या निधनामुळे कुटुंब आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


ही घटना त्यावेळी समोर आली जेव्हा गायकवाड यांची १२ आणि १४ वर्षांची दोन मुले शाळेतून घरी परतली आणि त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या. त्यांच्या आईने वारंवार फोन करूनही राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. मुलांनी शेजाऱ्यांची मदत मागितली आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, राजेंद्र गायकवाड यांनी घरातच गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.


विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री