पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या; पप्पा दार उघडत नाहीत, म्हणत मुलांची शेजाऱ्यांना विनवणी... पोलिसांना पाचारण

 पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाहतूक शाखेतील हवालदार राजेंद्र गायकवाड (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. धानोरी, लोहगाव येथील त्यांच्या घरी शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या निधनामुळे कुटुंब आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


ही घटना त्यावेळी समोर आली जेव्हा गायकवाड यांची १२ आणि १४ वर्षांची दोन मुले शाळेतून घरी परतली आणि त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या. त्यांच्या आईने वारंवार फोन करूनही राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. मुलांनी शेजाऱ्यांची मदत मागितली आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, राजेंद्र गायकवाड यांनी घरातच गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.


विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Comments
Add Comment

पुणे स्टेशनला दिलासा! एक्स्प्रेस गाड्यांसाठी हडपसर नवे टर्मिनल

पुणे : पुण्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जंक्शनवरील वाढत्या

जामनेर नगराध्यक्षपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन निवडणुकीच्या रिंगणात!

जामनेर : राज्यातील तब्बल २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच अनुशंघाने

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष