Thane Water Supply: ठाण्यात 'या' दिवशी २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कधी आणि कुठे?

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार


ठाणे: ठाण्यातील काही भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे आणि इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी २४ तासांचा वॉटर शटडाऊन करण्यात येणार आहे. असल्यामुळे ठाणेकरांना ऐन पावसाळ्यातच मंगळवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे.



पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे पालिकेकडून आवाहन


दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महापालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी दिनांक २२/०७/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते बुधवार दिनांक २३/०७/२०२५ रोजी सकाळी ९.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद केला जाईल?


या कामामुळे घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राच्या काही भागात मंगळवारी रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. अशा रितीने टप्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य