Thane Water Supply: ठाण्यात 'या' दिवशी २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कधी आणि कुठे?

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार


ठाणे: ठाण्यातील काही भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे आणि इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी २४ तासांचा वॉटर शटडाऊन करण्यात येणार आहे. असल्यामुळे ठाणेकरांना ऐन पावसाळ्यातच मंगळवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे.



पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे पालिकेकडून आवाहन


दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महापालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी दिनांक २२/०७/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते बुधवार दिनांक २३/०७/२०२५ रोजी सकाळी ९.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद केला जाईल?


या कामामुळे घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राच्या काही भागात मंगळवारी रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. अशा रितीने टप्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया