Thane Water Supply: ठाण्यात 'या' दिवशी २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कधी आणि कुठे?

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार


ठाणे: ठाण्यातील काही भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे आणि इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी २४ तासांचा वॉटर शटडाऊन करण्यात येणार आहे. असल्यामुळे ठाणेकरांना ऐन पावसाळ्यातच मंगळवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे.



पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे पालिकेकडून आवाहन


दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महापालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी दिनांक २२/०७/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते बुधवार दिनांक २३/०७/२०२५ रोजी सकाळी ९.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद केला जाईल?


या कामामुळे घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राच्या काही भागात मंगळवारी रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. अशा रितीने टप्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच