बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

पाटणा : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेला एक मोठी भेट दिली आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी 'एक्स' वर लिहिले की, 'आम्ही सुरुवातीपासून सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या वीजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचा फायदा राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना होणार आहे.


पुढील तीन वर्षांत सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांना त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाईल. कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. उर्वरितांसाठी सरकार योग्य मदत
देखील करणार आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना आता १२५ युनिटपर्यंतच्या विजेवर काहीही खर्च करावा लागणार नाही. तसेच असा अंदाज वर्तवण्यात येतोय की, पुढील तीन वर्षांत राज्यात १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल.


नितीश कुमार यांनी शिक्षण विभागात भरतीबद्दलही घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले होते की, 'आम्ही शिक्षण विभागाला सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची त्वरित गणना करण्यास आणि नियुक्त्यांसाठी लवकरच टीआरई4 परीक्षा घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, नियुक्त्यांमध्ये महिलांसाठी 35 टक्के आरक्षणाचा लाभ फक्त बिहारमधील महिला रहिवाशांनाच मिळणार आहे.

Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा