बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

  65

पाटणा : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेला एक मोठी भेट दिली आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी 'एक्स' वर लिहिले की, 'आम्ही सुरुवातीपासून सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या वीजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचा फायदा राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना होणार आहे.


पुढील तीन वर्षांत सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांना त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाईल. कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. उर्वरितांसाठी सरकार योग्य मदत
देखील करणार आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना आता १२५ युनिटपर्यंतच्या विजेवर काहीही खर्च करावा लागणार नाही. तसेच असा अंदाज वर्तवण्यात येतोय की, पुढील तीन वर्षांत राज्यात १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल.


नितीश कुमार यांनी शिक्षण विभागात भरतीबद्दलही घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले होते की, 'आम्ही शिक्षण विभागाला सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची त्वरित गणना करण्यास आणि नियुक्त्यांसाठी लवकरच टीआरई4 परीक्षा घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, नियुक्त्यांमध्ये महिलांसाठी 35 टक्के आरक्षणाचा लाभ फक्त बिहारमधील महिला रहिवाशांनाच मिळणार आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने