बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

पाटणा : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेला एक मोठी भेट दिली आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी 'एक्स' वर लिहिले की, 'आम्ही सुरुवातीपासून सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या वीजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचा फायदा राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना होणार आहे.


पुढील तीन वर्षांत सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांना त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाईल. कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. उर्वरितांसाठी सरकार योग्य मदत
देखील करणार आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना आता १२५ युनिटपर्यंतच्या विजेवर काहीही खर्च करावा लागणार नाही. तसेच असा अंदाज वर्तवण्यात येतोय की, पुढील तीन वर्षांत राज्यात १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल.


नितीश कुमार यांनी शिक्षण विभागात भरतीबद्दलही घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले होते की, 'आम्ही शिक्षण विभागाला सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची त्वरित गणना करण्यास आणि नियुक्त्यांसाठी लवकरच टीआरई4 परीक्षा घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, नियुक्त्यांमध्ये महिलांसाठी 35 टक्के आरक्षणाचा लाभ फक्त बिहारमधील महिला रहिवाशांनाच मिळणार आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत