बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

  56

पाटणा : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेला एक मोठी भेट दिली आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी 'एक्स' वर लिहिले की, 'आम्ही सुरुवातीपासून सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या वीजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचा फायदा राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना होणार आहे.


पुढील तीन वर्षांत सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांना त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाईल. कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. उर्वरितांसाठी सरकार योग्य मदत
देखील करणार आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना आता १२५ युनिटपर्यंतच्या विजेवर काहीही खर्च करावा लागणार नाही. तसेच असा अंदाज वर्तवण्यात येतोय की, पुढील तीन वर्षांत राज्यात १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल.


नितीश कुमार यांनी शिक्षण विभागात भरतीबद्दलही घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले होते की, 'आम्ही शिक्षण विभागाला सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची त्वरित गणना करण्यास आणि नियुक्त्यांसाठी लवकरच टीआरई4 परीक्षा घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, नियुक्त्यांमध्ये महिलांसाठी 35 टक्के आरक्षणाचा लाभ फक्त बिहारमधील महिला रहिवाशांनाच मिळणार आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )