राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी रोहित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये नेतृत्व पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरून ही माहिती दिली.


सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल, याची मला खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते कार्यरत आहेत. नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची वैचारिक चौकट अधिक बळकट करण्यासाठी रोहित पवार नेहमी प्रयत्नशील राहतील, असा मला विश्वास आहे."जयंत पाटील यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच पक्षात नवीन नेतृत्वाची निवड सुरू झाली. शशिकांत शिंदे यांना एकमताने अध्यक्षपदी निवडण्यात आले. आता रोहित पवार यांना प्रदेश पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आहे.


या नव्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संघटनात्मक रचना बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. रोहित पवार यांच्या अनुभवाचा आणि तरुण नेतृत्वाचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून