राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी रोहित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये नेतृत्व पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरून ही माहिती दिली.


सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल, याची मला खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते कार्यरत आहेत. नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची वैचारिक चौकट अधिक बळकट करण्यासाठी रोहित पवार नेहमी प्रयत्नशील राहतील, असा मला विश्वास आहे."जयंत पाटील यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच पक्षात नवीन नेतृत्वाची निवड सुरू झाली. शशिकांत शिंदे यांना एकमताने अध्यक्षपदी निवडण्यात आले. आता रोहित पवार यांना प्रदेश पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आहे.


या नव्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संघटनात्मक रचना बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. रोहित पवार यांच्या अनुभवाचा आणि तरुण नेतृत्वाचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

Comments
Add Comment

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही