अनौपचारिक बोलणं चुकूनही चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करू नका! - राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही माध्यमांवर ताशेरे ओढले आहेत. इगतपुरी येथील पक्षाच्या पदाधिकारी शिबिरादरम्यान झालेल्या अनौपचारिक संवादाचे विकृत आणि चुकीचे वृत्तांकन केल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


१४ आणि १५ जुलै रोजी इगतपुरी येथे मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात राज ठाकरे यांचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. या संवादात ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याबाबत विचारणा झाली असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "तो मेळावा राजकीय नव्हता, तर मराठी माणसाच्या विजयाचा होता."


‘युतीबाबत काय?’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी, “युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता?” असे उत्तर दिले. मात्र, काही निवडक इंग्रजी व मराठी माध्यमांनी चुकीची मथळेबाजी करत, "महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती पाहून युतीचा निर्णय घेतला जाईल," असे विधान त्यांनी केल्याचे भासवले.


या संदर्भात राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा म्हणजे अनौपचारिकच ठेवायच्या असतात. जे मी बोललोच नाही, ते माझ्या तोंडात घालणं, ही गंभीर बाब आहे. कोणाच्या सांगण्यावरून अशा बातम्या तयार करायच्या? आम्ही काही रोज-रोज पत्रकारांसमोर येऊन विधाने करावी अशी कोणाची अपेक्षा आहे का?"



राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय...



ठाकरे यांनी ट्विटमध्ये पुढे टाइम्स ऑफ इंडिया सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रानेही यासारखी बातमी शहानिशा न करता प्रसिद्ध केली, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. "सोशल मीडियावर चालणारा गोंधळ पत्रकारितेत येऊ नये, हीच अपेक्षा आहे," असंही त्यांनी म्हटलं. नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल!


राज ठाकरे यांनी पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उल्लेख करत स्पष्ट केलं की, "१९८४ पासून माझा पत्रकारितेशी प्रत्यक्ष संबंध आहे. आमच्या घरातूनच साप्ताहिक आणि नियतकालिक सुरू झाली होती. मी व्यंगचित्रकार म्हणून अनेक नामवंत माध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे दर्जेदार पत्रकारिता कशी असावी, हे मला माहीत आहे."


शेवटी राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केलं की, "मला जर कोणतंही राजकीय विधान करायचं असेल, तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन. त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांनी आणि त्यांच्या संपादकांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे वागावं, हीच माझी विनंती आहे."

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र