अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आता फडणवीसांचे लक्ष! स्वबळावर लढणार की काय? अमृता फडणवीस नेमक्या काय म्हणाल्या?

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महायुतीत रस्सीखेच वाढताना दिसत आहे. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी जोरदार पक्षप्रवेश सुरू केले असून, कार्यकर्त्यांनाही कामाला लावले आहे. यातच, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी पुण्यामध्येच केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.



पुण्याशी माझं खास नातं, कमतरतांची तक्रार करणार!


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी पुणे शहराशी आपलं खास नातं असल्याचं सांगितलं. "या शहरात माझी आजी राहते, त्यामुळे मला इथे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतं. येथील लोक आणि वातावरणाविषयी मला खूप आपुलकी वाटते. त्यामुळे मी दरवेळी इथे आल्यानंतर देवेंद्रजींना येथील कमतरतांबद्दल सांगत असते, काय सुधारणा करणे गरजेचे आहे? तसेच फडणवीस देखील पुण्याकडे तेवढंच लक्ष देतात," अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.



अजितदादा स्वबळावर लढणार?


दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार कामाला लागले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होईल की नाही, हे अजून स्पष्ट नाही, पण तुम्ही तयारीला लागा." पुणे महानगरपालिकेत हे आदेश देण्यात आल्याने, पुण्यात अजित पवारांचा पक्ष स्वबळावर लढणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.


या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यास, येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणखी रंगत येणार हे निश्चित!

Comments
Add Comment

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली

अल्पवयीन मुलीचं शोषण करत धर्मांतरासाठी दबाव, भिवंडीतील संतापजनक प्रकार समोर

भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय

युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं