भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली आहे. ताज्या घटनेत श्रीवर्धन शहरात भटक्या कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी महिलेच्या अंगावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने उडी मारली आणि चावा घेतला होता.


श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची पैदास वाढली आहे. संपूर्ण श्रीवर्धनमध्ये शेकडो मोकाट भटके कुत्रे फिरत आहेत. प्रत्येक पाखाडी , आळीत टोळक्याने बसलेले भटके कुत्रे नागरिक , विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिकांच्या मागे जात हातातील वस्तू ओढणे तसेच चावा घेण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार करू लागले आहेत. यामुळे स्थानिक त्रस्त आहेत. रस्त्यावरून एकट्याने जात असलेल्याच्या अंगावर उडी मारून चावण्याचे प्रकार वाढले आहेत. श्रीवर्धन तालुक्यात वर्षभरात १८७ जणांना कुत्रा चावण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.


श्रीवर्धन नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण , शस्त्रक्रिया करण्याची मोहीम अनेक वर्षांपासून रखडल्याने दरवर्षी श्वानांची संख्या वाढती आहे.नगरपरिषद हद्दीत प्रत्येक नाका, चौकात श्वानांचे टोळके दिसून येते.श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे व शस्त्रक्रिया करणे याबाबतीत जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु कुठलीही प्राणिमित्र संघटना अथवा ॲनिमल वेल्फेअर एजन्सीने याबाबतीत पुढाकार घेतला नाही. मोकाट श्वान पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी , त्यांना रेबीज लसीकरण करणे , निर्बिजीकरण करणे यासाठी नव्या निविदा काढण्यात येणार आहेत.लवकर अंमलबजावणी होईल असे श्रीवर्धन चे उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी सांगितले. दरम्यान शहरी भागात भटके कुत्रे झुंड करून राहतात. रात्रीच्या वेळी हे शहरातील रस्त्यावर झुंडीने

Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून