युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच आता या युद्धामुळे नाशिकच्या अंबड व सातपूर एमआयडीसी येथील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस पुरवठ्याअभावी येथील १२०० उद्योगांना फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम


इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाल्याने नाशिकमधील तब्बल बाराशे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग प्रभावित झाले आहेत. शासनाने व्यावसायिक एलपीजी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर एमएनजीएलकडून ४० टक्के पुरवठा कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्लेटिंग, पावडर कोटिंग उद्योग संकटात सापडले आहेत.

तर काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकला नियमित एक हजार २०० टन दरमहा एलपीजी गॅसचा पुरवठा इंडस्ट्रीजला केला जातो आणि २ हजार टन एलपीजी गॅस हॉटेल वगैरे ठिकाणी पुरविला जातो. तर साडेतीन लाख किलो एमएनजीएल गॅसचा पुरवठा केला जात आहे. मात्र, युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाला आहे.

१२०० उद्योग बंद होण्याच्या मार्गावर


सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असे सूक्ष्म, लघु, मध्यम सुमारे १२०० ते १३०० उद्योग आहेत. सूक्ष्म उद्योगांना दररोज १०० ते २०० किलो, मध्यम उद्योगांना दीड टन किलो आणि मोठ्या उद्योगांना फरनेससाठी अधिक गॅस लागतो. यात ९७ टक्के एलपीजी घरगुती वापरासाठी आणि ३ टक्के व्यावसायिक वापरासाठी दिला जातो.

आता ३ टक्के व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शिवाय सरकारने एलपीजी गॅस पुरवठा बंद करून दर ६८ रुपयांवरून ८६ रुपये केला आहे. आणि सबसिडीदेखील बंद करून टाकली आहे. त्यामुळे एलपीजी वापर करणारे उद्योग पूर्णपणे संकटात सापडले आहेत. एमएनजीएलची पाइपलाइन सर्व उद्योगात पोहोचलेली नाही. तरीही एमएनजीएलने ४० टक्के पुरवठा कमी करण्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे बाराशे उद्योग 'गॅस'वर असून, प्रक्रिया ठप्प होण्याची भीती आहे.
Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)