युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच आता या युद्धामुळे नाशिकच्या अंबड व सातपूर एमआयडीसी येथील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस पुरवठ्याअभावी येथील १२०० उद्योगांना फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम


इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाल्याने नाशिकमधील तब्बल बाराशे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग प्रभावित झाले आहेत. शासनाने व्यावसायिक एलपीजी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर एमएनजीएलकडून ४० टक्के पुरवठा कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्लेटिंग, पावडर कोटिंग उद्योग संकटात सापडले आहेत.

तर काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकला नियमित एक हजार २०० टन दरमहा एलपीजी गॅसचा पुरवठा इंडस्ट्रीजला केला जातो आणि २ हजार टन एलपीजी गॅस हॉटेल वगैरे ठिकाणी पुरविला जातो. तर साडेतीन लाख किलो एमएनजीएल गॅसचा पुरवठा केला जात आहे. मात्र, युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाला आहे.

१२०० उद्योग बंद होण्याच्या मार्गावर


सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असे सूक्ष्म, लघु, मध्यम सुमारे १२०० ते १३०० उद्योग आहेत. सूक्ष्म उद्योगांना दररोज १०० ते २०० किलो, मध्यम उद्योगांना दीड टन किलो आणि मोठ्या उद्योगांना फरनेससाठी अधिक गॅस लागतो. यात ९७ टक्के एलपीजी घरगुती वापरासाठी आणि ३ टक्के व्यावसायिक वापरासाठी दिला जातो.

आता ३ टक्के व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शिवाय सरकारने एलपीजी गॅस पुरवठा बंद करून दर ६८ रुपयांवरून ८६ रुपये केला आहे. आणि सबसिडीदेखील बंद करून टाकली आहे. त्यामुळे एलपीजी वापर करणारे उद्योग पूर्णपणे संकटात सापडले आहेत. एमएनजीएलची पाइपलाइन सर्व उद्योगात पोहोचलेली नाही. तरीही एमएनजीएलने ४० टक्के पुरवठा कमी करण्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे बाराशे उद्योग 'गॅस'वर असून, प्रक्रिया ठप्प होण्याची भीती आहे.
Comments
Add Comment

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर

राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने

Nida Khan : निदा खान TCS मधून निलंबित, अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २७ एप्रिलला

नाशिक : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला टीसीएसने सेवेतून निलंबित केले आहे. पोलीस निदाला शोधत आहे.

Kolhapur : कोल्हापूरमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणार

मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Education : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जून पासून नवीन अभ्यासक्रम

नागपूर : नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा