ठाकरे बंधूंची युती होणार नाही? राज ठाकरेंच्या आदेशाने चर्चांना 'ब्रेक'? संभ्रम वाढला!

मुंबई: त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरून तब्बल २० वर्षांनी एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर, आता त्यांच्या युतीबद्दलचा संभ्रम वाढला आहे. ५ जुलै रोजी वरळीतील NSCI डोममध्ये 'संयुक्त मराठी जल्लोष मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी 'एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत,' अशी भूमिका मांडली. मात्र, राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणतीही थेट घोषणा केली नाही. त्यातच, आता राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीसंदर्भात मला विचारल्याशिवाय कोणीही बोलू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उबाठा शिवसेना (ठाकरे गट) सोबतच्या युतीसंदर्भात माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलू नये, असे निर्देश दिले आहेत. "कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचे," असे राज ठाकरे यांनी सांगितल्याने दोन्ही पक्षांच्या युतीबद्दल नवा संभ्रम निर्माण झाला आहे.



उद्धव ठाकरे उत्सुक, पण राज ठाकरे सावध?


वरळीतील व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चांना जोर पकडला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेकदा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी तीव्र इच्छा व्यक्त केल्याचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात अतिशय सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी यावर फारसे भाष्य करणे टाळले.



राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार!


राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे भावनिक आवाहन केले. मात्र, भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत त्यांनी दिला नाही. त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी, राज ठाकरे यांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे.


मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी, मनसे आणि ठाकरे गटाची खरोखरच युती होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे आता या चर्चांना तात्पुरता 'ब्रेक' लागला आहे, असे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा