ठाकरे बंधूंची युती होणार नाही? राज ठाकरेंच्या आदेशाने चर्चांना 'ब्रेक'? संभ्रम वाढला!

मुंबई: त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरून तब्बल २० वर्षांनी एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर, आता त्यांच्या युतीबद्दलचा संभ्रम वाढला आहे. ५ जुलै रोजी वरळीतील NSCI डोममध्ये 'संयुक्त मराठी जल्लोष मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी 'एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत,' अशी भूमिका मांडली. मात्र, राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणतीही थेट घोषणा केली नाही. त्यातच, आता राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीसंदर्भात मला विचारल्याशिवाय कोणीही बोलू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उबाठा शिवसेना (ठाकरे गट) सोबतच्या युतीसंदर्भात माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलू नये, असे निर्देश दिले आहेत. "कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचे," असे राज ठाकरे यांनी सांगितल्याने दोन्ही पक्षांच्या युतीबद्दल नवा संभ्रम निर्माण झाला आहे.



उद्धव ठाकरे उत्सुक, पण राज ठाकरे सावध?


वरळीतील व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चांना जोर पकडला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेकदा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी तीव्र इच्छा व्यक्त केल्याचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात अतिशय सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी यावर फारसे भाष्य करणे टाळले.



राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार!


राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे भावनिक आवाहन केले. मात्र, भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत त्यांनी दिला नाही. त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी, राज ठाकरे यांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे.


मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी, मनसे आणि ठाकरे गटाची खरोखरच युती होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे आता या चर्चांना तात्पुरता 'ब्रेक' लागला आहे, असे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती