'लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...” काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. मात्र, या योजनेला विरोधकांनी जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. परंतु, हे आश्वासन पूर्ण करत नसल्याबाबत विरोधक महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यातच आता काही विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला जात असल्याबाबतही सरकारवर टीका होत आहे.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आज पाचव्या दिवशी संजय शिरसाट विधान भवनात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? 


माझ्या खात्यामधून दर महिन्याला ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला जातो. हा एकंदरीत प्रक्रियेचा भाग दर महिन्याला पूर्ण केला जातो. दर महिन्याला त्या फाइल मला मंजूर कराव्या लागतात. याबाबतची कल्पना मला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही ही गोष्ट सांगितली आहे. अजित पवार यांनी पैसे देण्याचे कबूल केले आहे. म्हणून मी आता वाद न घालता दर महिन्याला ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी देत असतो, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे