निलेश राणे यांच्या मागणीला यश, कुडाळ मालवण वीज प्रकरणी ऊर्जा राज्य मंत्र्यांची तात्काळ बैठक

सिंधुदुर्ग: विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांवर आवाज उठवत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी महावितरण आणि ऊर्जा विभागावर थेट सवाल केले. या मुद्द्यावर उबाठा गटाचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनीही उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे वीज वितरणात असलेल्या अडचणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल, वीजपुरवठ्याचा कमी दाब, आणि रखडलेले भूमिगत वीज प्रकल्प यावर सरकारला घेरले.

यादरम्यान निलेश राणे यांनी काही आरोप आणि गंभीर टीका केल्या आहेत.  “महावितरणमध्ये ९० टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत. मात्र त्यांना कामाचं प्रशिक्षणही दिलं जात नाही, आतापर्यंत ११ कंत्राटी कामगार गेले, मात्र कोणालाच मदत मिळाली नाही,"असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी “१५ वर्षांपासून भूमिगत वायर टाकण्याच्या कामात रस्ते खोदले जात आहेत, पण काम पूर्ण होत नाही,” अशी खंतही व्यक्त केली. आम्हाला किरकोळ मदत नको, भरीव निर्णय घ्या, असा ठाम आग्रह त्यांनी धरला.

नीलेश राणे यांच्या मुद्द्यावर या नेत्यांचा दुजोरा 


या मुद्द्याला पाठिंबा देताना भास्कर जाधव म्हणाले की, “सिंधुदुर्गात वीज प्रश्न गंभीर आहे. राणेंनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे.” रोहित पवार यांनीही “ऊर्जा विभागातील ढिसाळ कारभाराला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. याविषयी उत्तर देताना मंत्री मेघना बौर्डिकर यांनी कुडाळ मालवण विषय प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करून तोडगा काढणार असल्याचं सांगितलं.
Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी