निलेश राणे यांच्या मागणीला यश, कुडाळ मालवण वीज प्रकरणी ऊर्जा राज्य मंत्र्यांची तात्काळ बैठक

सिंधुदुर्ग: विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांवर आवाज उठवत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी महावितरण आणि ऊर्जा विभागावर थेट सवाल केले. या मुद्द्यावर उबाठा गटाचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनीही उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे वीज वितरणात असलेल्या अडचणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल, वीजपुरवठ्याचा कमी दाब, आणि रखडलेले भूमिगत वीज प्रकल्प यावर सरकारला घेरले.

यादरम्यान निलेश राणे यांनी काही आरोप आणि गंभीर टीका केल्या आहेत.  “महावितरणमध्ये ९० टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत. मात्र त्यांना कामाचं प्रशिक्षणही दिलं जात नाही, आतापर्यंत ११ कंत्राटी कामगार गेले, मात्र कोणालाच मदत मिळाली नाही,"असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी “१५ वर्षांपासून भूमिगत वायर टाकण्याच्या कामात रस्ते खोदले जात आहेत, पण काम पूर्ण होत नाही,” अशी खंतही व्यक्त केली. आम्हाला किरकोळ मदत नको, भरीव निर्णय घ्या, असा ठाम आग्रह त्यांनी धरला.

नीलेश राणे यांच्या मुद्द्यावर या नेत्यांचा दुजोरा 


या मुद्द्याला पाठिंबा देताना भास्कर जाधव म्हणाले की, “सिंधुदुर्गात वीज प्रश्न गंभीर आहे. राणेंनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे.” रोहित पवार यांनीही “ऊर्जा विभागातील ढिसाळ कारभाराला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. याविषयी उत्तर देताना मंत्री मेघना बौर्डिकर यांनी कुडाळ मालवण विषय प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करून तोडगा काढणार असल्याचं सांगितलं.
Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ