बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेतून बल्लारपूर शहरात टिंबर म्युझियम व झायलरियम उभारण्यासाठी आग्रही मागणी केली. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि विपुल वनसंपदेमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या बल्लारपूर शहरात १५० कोटींचे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारण्याची गरज आ. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली आणि सभागृहात मागणी लावून धरली. यानंतर हा प्रकल्प नक्कीच साकारला जाईल, येत्या अर्थसंकल्पात ही मागणी पूर्ण होईल, अशी स्पष्ट आणि सकारात्मक घोषणा वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी केली.


आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेद्वारे बल्लारपूरच्या सागवान लाकडाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय महत्त्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडत ही मागणी लावून धरली होती. आ. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात बल्लारपूरच्या सागवान लाकडाचा उपयोग अयोध्येतील श्रीराम मंदिर, संसद भवन, भारत मंडपम तसेच मा. पंतप्रधानांच्या कार्यालयातील फर्निचरमध्ये झाल्याचे नमूद करत महाराष्ट्राचा अभिमान अधोरेखित केला. तसेच जगातील प्रगत देशांमध्ये लाकूड संशोधन संस्थांची उभारणी झाल्याचे उदाहरण देत, बल्लारपूर येथेही अशाच दर्जाचे ज्ञानकेंद्र उभारण्याची गरज त्यांनी मांडली.


या प्रस्तावित प्रकल्पासाठी बल्लारपूर येथे सुमारे ६५ हेक्टर जागा उपलब्ध असून, ‘राम-लक्ष्मण’ नावाने ओळखले जाणारे ऐतिहासिक लाकूड, भामरागड परिसरातील जीवाश्म, लाकडाच्या ३२ दुर्मिळ प्रजाती, तसेच वनसंवर्धन, हवामान बदल आणि पर्यावरण शिक्षण यासंदर्भातील माहितीचे जतन, या म्युझियममध्ये करण्यात येईल.


बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या टिंबर म्युझियम व झायलरियममुळे या परिसराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळणार आहे. सागवान परंपरेचा ठेवा, राम-लक्ष्मण लाकूड, ऐतिहासिक संदर्भांचे जतन आणि वैज्ञानिक पद्धतीने मांडणी, यामुळे हे ठिकाण अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील एकमेव टिंबर म्युझियम म्हणून बल्लारपूर राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उभे राहील. त्यामुळे देश-विदेशातून पर्यटकांची वाढ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.


यासोबतच, या म्युझियममुळे संशोधन, शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. लाकूडशास्त्र, वनसंवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, तर स्थानिक युवकांना मार्गदर्शक, व्यवस्थापन आणि इतर सेवांमध्ये रोजगार उपलब्ध होईल. बल्लारपूर टिंबर म्युझियम व झायलरियममुळे आंतरराष्ट्रीय ओळख अधिक बळकट होत औद्योगिक विकासालाही गती मिळेल. जागतिक पर्यटक मोठ्या संख्येने येतील. एकूणच, हा प्रकल्प पर्यावरण जनजागृती, आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकास यांना चालना देणारा ठरेल.यासोबतच स्थानिक युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरच्या सागवान लाकडाच्या ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्वाचा संदर्भ देत टिंबर म्युझियम व झायलरियम उभारण्याची गरज अधोरेखित केली. त्याचवेळी ही मागणी योग्य व काळाची गरज असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. बल्लारपूर येथे उपलब्ध जागा, संशोधनाच्या संधी आणि पर्यटनाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प साकारला जाईल, असे ठाम आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.


Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ,

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.