Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान तिकीट परताव्याच्या नियमात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या नवीन नियमांनुसार, प्रवाशांना आता तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांचा ‘लुक-इन' किंवा ‘लॉक-इन' कालावधी मिळेल. या कालावधीत प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता तिकीट रद्द किंवा दुरुस्त करता येईल.



४८ तासात तिकीट रद्द किंवा दुरुस्ती करता येणार



​DGCA चे प्रमुख फैज अहमद किडवई यांनी स्पष्ट केले की, ही सुविधा अशा उड्डाणांसाठी असेल ज्यांचा प्रवास देशांतर्गत ७ दिवस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ दिवस आधी बुक केला आहे. तिकीट रद्द केल्यानंतर त्याचा परतावा १४ कामकाजाच्या दिवसांत मिळणे आता अनिवार्य असेल. विशेष म्हणजे, जर तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलवरून काढले असेल, तरीही परतावा देण्याची मुख्य जबाबदारी विमान कंपनीचीच असेल.


याव्यतिरिक्त, नावामध्ये काही चूक झाली असल्यास आणि ती २४ तासांच्या आत निदर्शनास आणून दिल्यास, कोणताही दंड आकारला जाणार नाही. वैद्यकीय इमर्जन्सी प्रसंगी प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्यास, विमान कंपन्यांना परतावा किंवा 'क्रेडिट शेल' देणे आवश्यक आहे.



१४ दिवसात मिळणार संपूर्ण रिफंड



नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारपासून या रिफंडज नियमांमध्ये सुधारणा केली आहे आणि प्रवाशांसाठी अनुकूल उपाययोजना सुरू केल्या आहेत. "ट्रॅव्हल एजंट/पोर्टलद्वारे तिकीट खरेदी केल्यास, परतफेडीची जबाबदारी एअरलाइन्सवर असेल कारण एजंट त्यांचे नियुक्त प्रतिनिधी असतात.


एअरलाइन्सने खात्री करावी की परतफेड प्रक्रिया १४ कामकाजाच्या दिवसांत पूर्ण झाली आहे," असे DGCA चे प्रमुख फैज अहमद किदवाई यांनी जारी केलेल्या सुधारित नियमांमध्ये म्हटले आहे. "वैद्यकीय आणीबाणीमुळे तिकीट रद्द झाल्यास, प्रवासादरम्यान प्रवासी किंवा त्याच पीएनआरमध्ये सूचीबद्ध असलेल्या कुटुंबातील सदस्याला प्रवेश/रुग्णालयात दाखल केले जाते, तर एअरलाइन्स परतावा किंवा क्रेडिट शेल देऊ शकतात.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य