पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश दिल्यानंतर इन्स्टाग्रामने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंट भारतात दिसणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन, हानिया आमिर अशा एकूण २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत.

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी भारतात पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला होता. या घटनेनंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला. भारत सरकारने पाकिस्तानमधून हाताळली जाणारी तसेच पाकिस्तानच्या नागरिकांची अशी अनेक सोशल मीडिया अकाउंट, यू ट्युब चॅनल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या संख्येत वाढ झाली. पण मागील काही तासांपासून निवडक पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात दिसण्यास सुरुवात झाली होती. हा प्रकार लक्षात येताच तातडीने कारवाई करुन भारत सरकारने २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात पुन्हा ब्लॉक केली.

देशाच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपप्रचाराला खीळ घालण्यासाठी भारताने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देशात बंदी घातली आहे. सरदारजी ३ या सिनेमात एका पाकिस्तानी अभिनेत्रीने काम केले आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यास भारत सरकारने परवानगी नाकारली आहे.
Comments
Add Comment

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार