पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश दिल्यानंतर इन्स्टाग्रामने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंट भारतात दिसणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन, हानिया आमिर अशा एकूण २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत.

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी भारतात पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला होता. या घटनेनंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला. भारत सरकारने पाकिस्तानमधून हाताळली जाणारी तसेच पाकिस्तानच्या नागरिकांची अशी अनेक सोशल मीडिया अकाउंट, यू ट्युब चॅनल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या संख्येत वाढ झाली. पण मागील काही तासांपासून निवडक पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात दिसण्यास सुरुवात झाली होती. हा प्रकार लक्षात येताच तातडीने कारवाई करुन भारत सरकारने २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात पुन्हा ब्लॉक केली.

देशाच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपप्रचाराला खीळ घालण्यासाठी भारताने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देशात बंदी घातली आहे. सरदारजी ३ या सिनेमात एका पाकिस्तानी अभिनेत्रीने काम केले आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यास भारत सरकारने परवानगी नाकारली आहे.
Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय